शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवावे- राधाकृष्ण महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:13 IST

पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवून त्यांना शिक्षण देऊन , त्यांना खूप मोठे बनवा, असा उपदेश गोवत्स प.पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजचे पाल्य हे उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना संस्कारी बनवून त्यांना शिक्षण देऊन , त्यांना खूप मोठे बनवा, असा उपदेश गोवत्स प.पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.श्रीराम गोभक्त सेवा समिती, जालना यांच्यातर्फे स्व. रामेश्वर लोया सभा मंडप, पांजळापोळ परिसर येथे प.पू. राधाकृष्ण महाराज यांची रामकथा सुरु आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशी भाविकांना उपदेश देताना राधाकृष्ण महाराज म्हणाले की, आपण समाजात वावरताना घरातील संस्कार शोधण्याची गरज आहे. घर छोटे असेल तरी चालेल परंतू घरातील श्रेष्ठत्व शोधा; परंतु अलीकडच्या काळात मोठ्या घरात श्रेष्ठत्व संपत चालले की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे.आजकाल प्रत्येक जण मान, सन्मान मिळावा यासाठी मोठी प्रतिष्ठा करत असतो; परंतु अशा मान, सन्मानाला दूर ठेवा. मान, सन्मानाचा भ्रम प्रत्येकाने आपल्या डोक्यातूनकाढून टाकावा. आपल्या कर्तृत्वातून आपल्याला आपोआपच प्रतिष्ठा समाज दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तृत्व चांगले ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक जीवन जगताना आनंदी राहावे. प्रत्येक जण हा २४ तास वाईट नसतो. त्यामुळे अशा लोकांची घृणा करु नका. उलट अशांना सुधारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपले कर्तृत्व हे आपल्या आचरणातून सिद्ध होत असते.त्यामुळे आपले आचरण चांगले ठेवा. यासाठी जीवनात तप करा. आजच्या घडीला संपत्ती तसेच इतर कारणांसाठी आपआपसात भांडणे सुरु आहेत. परंतू ही गोष्ट आपल्या अगोगतीकडे नेणारी आहेत. त्यामुळे आपआपसात कधीही भांडू नका. असे आवाहन करून गोमातेची सेवा करून तिचे पालनपोषन करण्याचे आवाहनही महाराजांनी यावेळी केले.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक