शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

प्रत्येक ग्रामपंचायतीने कामांचे नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:28 IST

स्थलांतर रोखण्यासह नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने कामाचे नियोजन करून त्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देश रोजगार हमी योजनेचे उपायुक्त पाटोदकर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळाने गंभीरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अनेकांच्या हाताला रोजगार नसल्याने स्थलांतर वाढले आहे. हे स्थलांतर रोखण्यासह नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने कामाचे नियोजन करून त्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देश रोजगार हमी योजनेचे उपायुक्त पाटोदकर यांनी दिले.बुधवारी उपायुक्त पाटोदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंठा, परतूर येथील उपविभागिय अधिकारी तसेच तहसीलदारांची उपस्थिती होती. दरम्यान कृषी अधीक्षक शिंदे, आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांची हजेरी यावेळी होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ हेही उपस्थित होते.अनेकांना कामाची गरज : मजूर उपस्थितीतूनच चित्र स्पष्टजालना जिल्ह्यात जवळपास चारशे कामांवर १२ हजार ८०० मजूर आहेत. या मजुरांच्या उपस्थितीवरूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामांचे नियोजन करणे किती गरजेचे आहे, हे लक्षात घ्यावे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात किती आणि कोणकोणती कामे उपलब्ध करून देता येतील यावर भर द्यावा, तसेच त्यांचा स्वतंत्र आराखडा तयार करून तो जिल्हाधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश यावेळी पाटोदकर आणि रोजगार हमी योजनेचे प्रभारी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले. अनेक गावांतून कामे मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेण्याचेही यावेळी सूचित करण्यात आले.

टॅग्स :droughtदुष्काळgovernment schemeसरकारी योजना