शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक ग्रामपंचायतीने कामांचे नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:28 IST

स्थलांतर रोखण्यासह नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने कामाचे नियोजन करून त्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देश रोजगार हमी योजनेचे उपायुक्त पाटोदकर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळाने गंभीरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अनेकांच्या हाताला रोजगार नसल्याने स्थलांतर वाढले आहे. हे स्थलांतर रोखण्यासह नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने कामाचे नियोजन करून त्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देश रोजगार हमी योजनेचे उपायुक्त पाटोदकर यांनी दिले.बुधवारी उपायुक्त पाटोदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंठा, परतूर येथील उपविभागिय अधिकारी तसेच तहसीलदारांची उपस्थिती होती. दरम्यान कृषी अधीक्षक शिंदे, आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांची हजेरी यावेळी होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ हेही उपस्थित होते.अनेकांना कामाची गरज : मजूर उपस्थितीतूनच चित्र स्पष्टजालना जिल्ह्यात जवळपास चारशे कामांवर १२ हजार ८०० मजूर आहेत. या मजुरांच्या उपस्थितीवरूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामांचे नियोजन करणे किती गरजेचे आहे, हे लक्षात घ्यावे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात किती आणि कोणकोणती कामे उपलब्ध करून देता येतील यावर भर द्यावा, तसेच त्यांचा स्वतंत्र आराखडा तयार करून तो जिल्हाधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश यावेळी पाटोदकर आणि रोजगार हमी योजनेचे प्रभारी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले. अनेक गावांतून कामे मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेण्याचेही यावेळी सूचित करण्यात आले.

टॅग्स :droughtदुष्काळgovernment schemeसरकारी योजना