शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

अभियंते, बी.टेक.धारकही ‘खाकी’च्या रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:41 IST

पोलीस भरती प्रक्रियेसाठी केवळ बारावी उत्तीर्णची अट असताना चक्क संगणक अभियंते, प्राध्यापक व बी.टेक. झालेल्या उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेत लेखी परीक्षेला हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढत्या स्पर्धेमुळे प्रत्येकजण मिळेल ती नोकरी करण्याची तयारी ठेवत आहे. येथील पोलीस भरती प्रक्रियेसाठी केवळ बारावी उत्तीर्णची अट असताना चक्क संगणक अभियंते, प्राध्यापक व बी.टेक. झालेल्या उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेत लेखी परीक्षेला हजेरी लावली.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील ५० जागांसाठी नुकतीच पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ५० हजार जागांसाठी सुमारे दहा हजारांवर अर्ज प्राप्त झाल्याने येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता जिल्हा पोलीस दलाने सुुरुवातीपासून चोख नियोजन ठेवले होते. पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी बारावी उत्तीर्णची अट असताना चक्क बीई, बी.टेक, अ‍ॅग्रिकल्चरल, बीपीएड, एमपीएड, इंटेरिअर डिझायनिंग, एमबीए, एम. लिब, एम. एसस्सी, बी. एसस्सी अग्री व विविध विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६७५ उमेदवार आॅनलाईन अर्ज भरून पोलीस भरतीच्या मैदानात उतरले. यामध्ये ३२४ बी.एससी तर विविध विषयांत एमएम झालेल्या १९७ उमेदवारांचा समावेश होता. मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण १३१२ उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे लेखी परीक्षेला बोलावण्यात आले होते. पोलीस भरतीची लेखी परीक्षा देणाºयांमध्येही उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या दीडशेंवर होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली. एकंदरीत नोकरीच्या मर्यादित संधी, वाढते वय यामुळे उमेदवार मिळेल ती नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या एकत्रित गुणांची यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी लावण्यात आली असून, त्यावर कुणास काही आक्षेप असल्यास तो दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

टॅग्स :police parade groundपोलिस कवायत मैदानJalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाPoliceपोलिसexamपरीक्षा