शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सायबर गुन्ह्यांवर अधिक लक्ष देण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:51 IST

वाढलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने गुन्ह्यांवर लक्ष देण्याबाबत पोलीस यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या जातात, अशी माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत आहे. वाढलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने गुन्ह्यांवर लक्ष देण्याबाबत पोलीस यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या जातात, अशी माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली.जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची तपासणी, कामगिरीचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी ते जालना येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. रवींद्रकुमार सिंघल यांनी गुरूवारी दिवसभरात वाहतूक शाखेच्या कारभाराचा आढावा घेतला. वाहतूक शाखेकडून केल्या जाणाऱ्या कारवाई, वाहतूक मार्ग, वाहतूक कोंडी, तक्रारी यासह इतर बाबींची त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. शिवाय पोलीस मुख्यालयांतर्गत कामकाजाचाही आढावा त्यांनी घेतला.यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सिंघल म्हणाले, शहर वाहतूक शाखेच्या कामाचा आढावा घेतला आहे. मोकाट जनावरे कारवाईसाठी पालिकेने वाहन दिले असून, कारवाई करण्यात येईल. निधी प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येतील. गुन्हे घडू नयेत, यासाठी पोलीस दल वेळोवेळी आवश्यक ती दक्षता घेते.मागील काही काळापासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषत: आर्थिक फसवणूक, सामाजिक द्वेष पसरविणारे गुन्हे घडत आहेत. यात अधिकाधिक शिक्षित आरोपींचा समावेश दिसून येतो. गुन्ह्याचे बदलणारे स्वरूप पाहता पोलीस दलही असे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. अधिकारी, कर्मचाºयांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते, असेही सिंघल यांनी सांगितले.यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, सिंघल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी परेड होणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील ठाणेनिहाय दाखल गुन्हे, गुन्ह्यांचा उलगडा यासह इतर बाबींवर आढावा घेतला जाणार आहे.शहरातील कदीम पोलीस ठाणे, सदरबाजार पोलीस ठाण्याची इमारत जुनी आहे. तालुका पोलीस ठाणे तात्पुरत्या इमारतीत सुरू आहे. शहरातील पोलीस चौक्यांची अवस्थाही बिकट आहे.जिल्ह्यातील इतर काही पोलीस ठाण्यांच्या इमारती, अधिकारी, कर्मचा-यांची निवासस्थाने हे प्रश्नही आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठस्तरावरून विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJalna Policeजालना पोलीस