शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांवर अधिक लक्ष देण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:51 IST

वाढलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने गुन्ह्यांवर लक्ष देण्याबाबत पोलीस यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या जातात, अशी माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत आहे. वाढलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने गुन्ह्यांवर लक्ष देण्याबाबत पोलीस यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या जातात, अशी माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली.जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची तपासणी, कामगिरीचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी ते जालना येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. रवींद्रकुमार सिंघल यांनी गुरूवारी दिवसभरात वाहतूक शाखेच्या कारभाराचा आढावा घेतला. वाहतूक शाखेकडून केल्या जाणाऱ्या कारवाई, वाहतूक मार्ग, वाहतूक कोंडी, तक्रारी यासह इतर बाबींची त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. शिवाय पोलीस मुख्यालयांतर्गत कामकाजाचाही आढावा त्यांनी घेतला.यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सिंघल म्हणाले, शहर वाहतूक शाखेच्या कामाचा आढावा घेतला आहे. मोकाट जनावरे कारवाईसाठी पालिकेने वाहन दिले असून, कारवाई करण्यात येईल. निधी प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येतील. गुन्हे घडू नयेत, यासाठी पोलीस दल वेळोवेळी आवश्यक ती दक्षता घेते.मागील काही काळापासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषत: आर्थिक फसवणूक, सामाजिक द्वेष पसरविणारे गुन्हे घडत आहेत. यात अधिकाधिक शिक्षित आरोपींचा समावेश दिसून येतो. गुन्ह्याचे बदलणारे स्वरूप पाहता पोलीस दलही असे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. अधिकारी, कर्मचाºयांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते, असेही सिंघल यांनी सांगितले.यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, सिंघल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी परेड होणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील ठाणेनिहाय दाखल गुन्हे, गुन्ह्यांचा उलगडा यासह इतर बाबींवर आढावा घेतला जाणार आहे.शहरातील कदीम पोलीस ठाणे, सदरबाजार पोलीस ठाण्याची इमारत जुनी आहे. तालुका पोलीस ठाणे तात्पुरत्या इमारतीत सुरू आहे. शहरातील पोलीस चौक्यांची अवस्थाही बिकट आहे.जिल्ह्यातील इतर काही पोलीस ठाण्यांच्या इमारती, अधिकारी, कर्मचा-यांची निवासस्थाने हे प्रश्नही आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठस्तरावरून विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJalna Policeजालना पोलीस