शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षण घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:48 IST

समाज हा शिक्षणाने घडत असतो, त्यामुळे क्षत्रिय कुमावत समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेबराव कुमावत यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुमावत समाजाची प्रगती करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. जीवनात शिक्षणाचे मोठे महत्व आहे. समाज हा शिक्षणाने घडत असतो, त्यामुळे क्षत्रिय कुमावत समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेबराव कुमावत यांनी केले.जालना येथे अखिल महाराष्ट्र कुमावत समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन बारा बलुतेदार महासंघाचे राज्याध्यक्ष कल्याण दळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बलुतेदार महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र खंडेलवाल, अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश छल्लारे, संतोष परदेशी, गणेश राजवाल, प्रमोद कुमावत, तुकाराम लोदवाल, भाऊसाहेब नारनवले, गणेश मोहोरे, प्रभा बारवाल यांची उपस्थिती होती.यावेळी कुमावत म्हणाले, क्षत्रिय कुमावत हा समाज शिक्षणाची कास धरून प्रगती करत आहे. समाज बांधवांच्या विविध अडचणी सोडवण्याचे काम संघटना करत आहे. बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्यांनी सर्व योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. प्रमोद कुमावत म्हणाले, कुमावत समाजाच्या उद्धारासाठी आपण शिक्षण व पैसे ही दोन्ही माध्यमे कशी मिळवता येईल, याचा विचार करावा. व्यसनांपासून दूर राहून आपण आरोग्य व पैसा दोन्ही वाचवू शकतो. यातूनच आपला विकास होईल, असे त्यांनी सांगितले.तसेच सरला कामे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी राजू छल्लारे यांची नियुक्ती करण्यात आली. याच वेळी जालना जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिक