शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कोरोना काळात वडील गेले, आता अपघातात आईचेही छत्र हरवले, सात मुले झाली पोरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 14:48 IST

वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळून एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाला, गावावर दु:खाचा डोंगर काेसळल्याने एकही चूल पेटली नाही.

- राहुल वरशिळजालना : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आघात झाला. काही पाल्यांचे आई-वडील असे दोन्ही छत्र हरवले, तर काहींनी घराचा एकमेव आधार असलेले वडील गमावले. अशीच एक घटना बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथेही घडली होती. यात २०२०मध्ये घरातील कर्ता पुरुष वडील बाळू तायडे (वय ४५) गेल्याने सात मुले व पत्नी पाेरकी झाली होती. त्या दु:खातून कसेबसे सावरत नाही तोच गुरुवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर झालेल्या अपघात पत्नी नंदाबाई बाळू तायडेे (वय ४०) यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे आता सातही मुले कायमची पोरकी झाली आहेत. काळाने गुरुवारी घाला घातल्याने एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, गावावर दु:खाचा डोंगर काेसळल्याने एकही चूल पेटली नाही.

नंदाबाई तायडे यांचे जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण माहेर असून, २००२ मध्ये चनेगाव येथील बाळू तायडे यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरू होता. यादरम्यान या दाम्पत्याला पाच मुली व दोन मुलगे झाले. या सर्व मुलांचे शिक्षण दोघे पत्नी-पत्नी आनंदाने ऊसतोड आणि मजुरी करून करीत होते. हे दाम्पत्य सुखी संसाराचा गाडा हाकत होते. परंतु, कोरोनाकाळात वडील बाळू तायडे यांच्यावर काळाने घाला घातला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आई नंदाबाई यांनी पाचपैकी दोन मुलींचे लग्न केले आहे, तर इतर पाच जणांचे शिक्षण सुरू आहे.

खासदारांनी उचलली पुढील शिक्षणाची जबाबदारीबदनापूर येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात एक मुलगी इयत्ता बारावी, दुसरी आठवीमध्ये आणि तिसरी मुलगी जालना येथे दहावीमध्ये शिकत आहे. तर एक मुलगा पाचवी आणि सर्वांत लहान तिसरीच्या वर्गात आहे. आता या मुलांच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च खासदार डॉ. कल्याण काळे करणार असल्याचे त्यांनी स्वत: अंत्यसंस्काराला उपस्थित राहून जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे गजानन गीते यांनीही आपल्या संस्थेमध्ये बारावीपर्यंत मोफत शिक्षण देणार असल्याचे सांगितले.

आता आम्ही कुणाला मम्मी म्हणावंजालना - राजूर रोडवर गुरुवारी झालेल्या अपघातात एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. या पाचही मृतदेहांवर शुक्रवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यात नंदाबाई तायडे यांच्यावर अंत्यसंस्कार करत असताना त्यांची सातही मुले आता आम्ही कुणाला मम्मी म्हणावं... अस म्हणून टाहो फोडत होती. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित झालेल्या सर्व महिलांसह नागरिकांनाही गहिवरून आले.

नंदाबाईंच्या मुलांना अकरा लाखांची मदतगुरुवारी झालेल्या अपघातात नंदाबाई तायडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांची सात मुले पोरकी झाली. त्यामुळे शुक्रवारी अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भाजपचे जालना विधानसभाप्रमुख भास्कर दानवे, उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी प्रत्येकी एक लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख अशी एकूण ११ लाखांची मदत जाहीर करून सर्वांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना