शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

५ वर्षात जिल्ह्यातील ६६७ रुग्ण झाले कुष्ठरोगमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:10 IST

मागील पाच वर्षात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगापासून मुक्त करण्यात आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. या रुग्णांना कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांनाही यश येताना दिसत आहे. कारण मागील पाच वर्षात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगापासून मुक्त करण्यात आले आहे.दरवर्षी जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात येते. त्यानुसार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येते. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे जिल्ह्यात दरवर्षी अनेकजण कुष्ठरोगाच्या तावडीतून मुक्त होत आहेत.कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. कुष्ठरुग्णांवर योग्य उपचार करण्यात येतात. या प्रयत्नामुळे मागील सहा वर्षांत जिल्हा आरोग्य विभागाने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगमुक्त केले आहे. यात २०१४-१५ मध्ये १३६, २०१५-१६ मध्ये ११५, २०१६-१७ मध्ये १२८, २०१७-१८ मध्ये ११७, २०१८-१९ मध्ये १४१ रुग्णांना कुष्ठरोगमुक्त करण्यात आले आहे.यावर्षी देखील जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम मे महिन्यात राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाभरातील ७१२ गावामधील ३ लाख २२ हजार ३६२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली गेली. आरोग्य सेवकांद्वारे ही मोहीम राबविण्यात आली.यात ३२३ संशयित रूग्ण आढळून आले. या सर्व संशयित रूग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४ जणांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले.जनजागृतीवर भरकुष्ठरोग निर्मूलनाकरिता शासनाच्या आरोग्य विभागाद्वारा जनजागृतीवर जास्त भर दिला जात आहे. नागरिक जागरुक झाले आहेत. लोक स्वत: दवाखान्यात येऊन कुष्ठरोगाचे उपचार करताना दिसतात. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नि:शुल्क तपासणी केली जात असून याचा लाभ घेण्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.आजार नियंत्रणातकुष्ठरोगावर नियमितपणे औषधोपचाराने आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. मागील पाच वर्र्षांत कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. सहा ते बारा महिन्यांच्या उपचारानंतर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. शरीरावर पाच किंवा यापेक्षा कमी चट्ट्याचे व्रण असल्यास सहा महिन्यांचा उपचार दिला जातो तर यापेक्षा अधिक चट्टे असल्यास एक वर्ष औषधोपचार करणे अनिवार्य आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयGovernmentसरकार