शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

५ वर्षात जिल्ह्यातील ६६७ रुग्ण झाले कुष्ठरोगमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:10 IST

मागील पाच वर्षात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगापासून मुक्त करण्यात आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. या रुग्णांना कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांनाही यश येताना दिसत आहे. कारण मागील पाच वर्षात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगापासून मुक्त करण्यात आले आहे.दरवर्षी जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात येते. त्यानुसार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येते. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे जिल्ह्यात दरवर्षी अनेकजण कुष्ठरोगाच्या तावडीतून मुक्त होत आहेत.कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. कुष्ठरुग्णांवर योग्य उपचार करण्यात येतात. या प्रयत्नामुळे मागील सहा वर्षांत जिल्हा आरोग्य विभागाने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगमुक्त केले आहे. यात २०१४-१५ मध्ये १३६, २०१५-१६ मध्ये ११५, २०१६-१७ मध्ये १२८, २०१७-१८ मध्ये ११७, २०१८-१९ मध्ये १४१ रुग्णांना कुष्ठरोगमुक्त करण्यात आले आहे.यावर्षी देखील जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम मे महिन्यात राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाभरातील ७१२ गावामधील ३ लाख २२ हजार ३६२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली गेली. आरोग्य सेवकांद्वारे ही मोहीम राबविण्यात आली.यात ३२३ संशयित रूग्ण आढळून आले. या सर्व संशयित रूग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४ जणांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले.जनजागृतीवर भरकुष्ठरोग निर्मूलनाकरिता शासनाच्या आरोग्य विभागाद्वारा जनजागृतीवर जास्त भर दिला जात आहे. नागरिक जागरुक झाले आहेत. लोक स्वत: दवाखान्यात येऊन कुष्ठरोगाचे उपचार करताना दिसतात. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नि:शुल्क तपासणी केली जात असून याचा लाभ घेण्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.आजार नियंत्रणातकुष्ठरोगावर नियमितपणे औषधोपचाराने आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. मागील पाच वर्र्षांत कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. सहा ते बारा महिन्यांच्या उपचारानंतर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. शरीरावर पाच किंवा यापेक्षा कमी चट्ट्याचे व्रण असल्यास सहा महिन्यांचा उपचार दिला जातो तर यापेक्षा अधिक चट्टे असल्यास एक वर्ष औषधोपचार करणे अनिवार्य आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयGovernmentसरकार