शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षात जिल्ह्यातील ६६७ रुग्ण झाले कुष्ठरोगमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:10 IST

मागील पाच वर्षात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगापासून मुक्त करण्यात आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. या रुग्णांना कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांनाही यश येताना दिसत आहे. कारण मागील पाच वर्षात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगापासून मुक्त करण्यात आले आहे.दरवर्षी जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात येते. त्यानुसार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येते. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे जिल्ह्यात दरवर्षी अनेकजण कुष्ठरोगाच्या तावडीतून मुक्त होत आहेत.कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. कुष्ठरुग्णांवर योग्य उपचार करण्यात येतात. या प्रयत्नामुळे मागील सहा वर्षांत जिल्हा आरोग्य विभागाने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगमुक्त केले आहे. यात २०१४-१५ मध्ये १३६, २०१५-१६ मध्ये ११५, २०१६-१७ मध्ये १२८, २०१७-१८ मध्ये ११७, २०१८-१९ मध्ये १४१ रुग्णांना कुष्ठरोगमुक्त करण्यात आले आहे.यावर्षी देखील जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम मे महिन्यात राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाभरातील ७१२ गावामधील ३ लाख २२ हजार ३६२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली गेली. आरोग्य सेवकांद्वारे ही मोहीम राबविण्यात आली.यात ३२३ संशयित रूग्ण आढळून आले. या सर्व संशयित रूग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४ जणांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले.जनजागृतीवर भरकुष्ठरोग निर्मूलनाकरिता शासनाच्या आरोग्य विभागाद्वारा जनजागृतीवर जास्त भर दिला जात आहे. नागरिक जागरुक झाले आहेत. लोक स्वत: दवाखान्यात येऊन कुष्ठरोगाचे उपचार करताना दिसतात. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नि:शुल्क तपासणी केली जात असून याचा लाभ घेण्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.आजार नियंत्रणातकुष्ठरोगावर नियमितपणे औषधोपचाराने आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. मागील पाच वर्र्षांत कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. सहा ते बारा महिन्यांच्या उपचारानंतर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. शरीरावर पाच किंवा यापेक्षा कमी चट्ट्याचे व्रण असल्यास सहा महिन्यांचा उपचार दिला जातो तर यापेक्षा अधिक चट्टे असल्यास एक वर्ष औषधोपचार करणे अनिवार्य आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयGovernmentसरकार