शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कमी पावसामुळे फूलशेती उद्ध्वस्त, विमा कवच नसल्याने शेतकरी संकटात

By शिवाजी कदम | Updated: July 28, 2023 12:57 IST

फुलशेतीला विमा कवच नसल्याने सरकारने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

हसनाबाद : भाेकरदन तालुक्यात पावसाची ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती आहे. काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस पडला असला तरी काही गावांमध्ये अपुऱ्या पावसामुळे पिकांना फटका बसत आहे. तालुक्यातील वालसा खालसा येथील शेतकरी दीपक जाधव यांची फूल शेती कमी पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. फुलशेतीला विमा कवच नसल्याने सरकारने मदत करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.

नगदी पीक म्हणून फुलशेतीकडे पाहण्यात येते. मागील चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने फुलशेती बहरली होती. मात्र, यावर्षी कमी पावसामुळे फुलशेतीत लावलेला खर्च निघणे अवघड झाले आहे. भोकरदन जवळील वालसा खालसा येथील तरुण शेतकरी दीपक सुभाष जाधव यांची गट नंबर १८८ मध्ये ३ एकर शेती आहे. ते दोन एकर शेतीवर फुलशेती करतात. मात्र, समाधानकारक पावसाअभावी फुलझाडे सुकून गेली आहेत.

दहा वर्षांपासून फुलशेतीदीपक जाधव हे दहा वर्षांपासून फुलशेती करतात. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून देखील नोकरी न मिळाल्याने त्यांनी दोन एकरावर फुलशेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात तीस हजार रुपये खर्च केले. यात गलांडा, गुलाब, झेंडू या फुलांची लागवड केली. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने त्यांनी डोक्यावर पाणी वाहून रोपे जगवली. मात्र, जुलै महिना संपायला आला तरी, पावसाने हजेरी न लावल्यामुळे तसेच खराब वातावरणामुळे रोपांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. धुके व जोराचा पाऊस नसल्यामुळे संपूर्ण झाडे वाळून गेली आहेत.

दीड लाखांचे उत्पन्न अपेक्षितयावर्षी दीपक जाधव यांना फुलशेतीतून जवळपास दीड लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. कुटुंबातील आई, वडील व तीन भाऊ हे कुटुंब यावरच उपजीविका करतात. शेतातून काढलेली फुले सिल्लोड, भोकरदन, राजुरी, चिखली, जालना येथे जाऊन विकतात. दीपक जाधव हे हसनाबाद येथे घरोघरी जाऊन फुलांच्या माळा विकून उदरनिर्वाह करतात. मात्र, फुलशेती उद्ध्वस्त झाल्याने जाधव कुटुंब हवालदिल झाले आहे. या व्यवसायाला विमा कवच नसल्याने सरकारी अनुदान मिळत नाही. त्यातच आता निसर्गाने साथ न दिल्याने जाधव कुटुंबावर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसJalanaजालना