शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणांमुळेच शेतकरी, कामगार भिकेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:09 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रथम शेतकरी नागावला गेला आणि आता कामगार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. फसव्या घोषणा आणि चुकीचे अर्थकारण यामुळे देशावर हि परिस्थिती ओढावली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : घनसावंगी येथे शिवस्वराज्य यात्रा, नागरिकांची लक्षणीय उपस्थिती, पक्ष सोडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्र

तीर्थपुरी : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रथम शेतकरी नागावला गेला आणि आता कामगार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. फसव्या घोषणा आणि चुकीचे अर्थकारण यामुळे देशावर हि परिस्थिती ओढावली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शनिवारी घनसावंगी येथे दाखल झाली होती. यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना जयंत पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही मंदीची लाट होती. परंतु, त्यात नोकऱ्यांवर गदा आली नव्हती. नोटबंदी, जीएसटी यामुळे आज उद्योग, व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.शेतकºयानंतर आता कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. असे असले तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सैरभैर होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष नव्या उमेदीने उभारी घेईल, यात शंका नसल्याचे सांगून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर आजही लोकांचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.यावेळी रूपाली चाकणकर यांनीही मार्गदर्शन केले. राज्यात महिला सुरक्षीत नसल्याचे सांगून अन्याय-अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, खा. अमोल कोल्हे, माजी आ. संजय वाघचौरे, उमेश पाटील, अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, महेबूब शेख, विक्रम पडवळ, अमोल मिटकरी, उत्तम पवार, तात्यासाहेब उडाण, बबलू चौधरी, अमरसिंह खरात, जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे, कल्याण सपाटे, सतीश हांडे आदींची उपस्थिती होती.सुडाचे राजकारण केले नाही : टोपेप्रास्ताविकात बोलताना माजी आमदार राजेश टोपे म्हणाले की, आपण कधीच सुडाचे राजकारण केले नाही. जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. पाच वर्षात संघर्ष करून निधी मिळविला.तसेच पीकविमा मिळावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या योजनांवर टीका केली.

टॅग्स :JalanaजालनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलRajesh Topeराजेश टोपे