शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

सरकारच्या धोरणांमुळेच शेतकरी, कामगार भिकेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:09 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रथम शेतकरी नागावला गेला आणि आता कामगार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. फसव्या घोषणा आणि चुकीचे अर्थकारण यामुळे देशावर हि परिस्थिती ओढावली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : घनसावंगी येथे शिवस्वराज्य यात्रा, नागरिकांची लक्षणीय उपस्थिती, पक्ष सोडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्र

तीर्थपुरी : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रथम शेतकरी नागावला गेला आणि आता कामगार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. फसव्या घोषणा आणि चुकीचे अर्थकारण यामुळे देशावर हि परिस्थिती ओढावली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शनिवारी घनसावंगी येथे दाखल झाली होती. यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना जयंत पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही मंदीची लाट होती. परंतु, त्यात नोकऱ्यांवर गदा आली नव्हती. नोटबंदी, जीएसटी यामुळे आज उद्योग, व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.शेतकºयानंतर आता कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. असे असले तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सैरभैर होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष नव्या उमेदीने उभारी घेईल, यात शंका नसल्याचे सांगून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर आजही लोकांचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.यावेळी रूपाली चाकणकर यांनीही मार्गदर्शन केले. राज्यात महिला सुरक्षीत नसल्याचे सांगून अन्याय-अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, खा. अमोल कोल्हे, माजी आ. संजय वाघचौरे, उमेश पाटील, अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, महेबूब शेख, विक्रम पडवळ, अमोल मिटकरी, उत्तम पवार, तात्यासाहेब उडाण, बबलू चौधरी, अमरसिंह खरात, जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे, कल्याण सपाटे, सतीश हांडे आदींची उपस्थिती होती.सुडाचे राजकारण केले नाही : टोपेप्रास्ताविकात बोलताना माजी आमदार राजेश टोपे म्हणाले की, आपण कधीच सुडाचे राजकारण केले नाही. जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. पाच वर्षात संघर्ष करून निधी मिळविला.तसेच पीकविमा मिळावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या योजनांवर टीका केली.

टॅग्स :JalanaजालनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलRajesh Topeराजेश टोपे