शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणांमुळेच शेतकरी, कामगार भिकेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:09 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रथम शेतकरी नागावला गेला आणि आता कामगार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. फसव्या घोषणा आणि चुकीचे अर्थकारण यामुळे देशावर हि परिस्थिती ओढावली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : घनसावंगी येथे शिवस्वराज्य यात्रा, नागरिकांची लक्षणीय उपस्थिती, पक्ष सोडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्र

तीर्थपुरी : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रथम शेतकरी नागावला गेला आणि आता कामगार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. फसव्या घोषणा आणि चुकीचे अर्थकारण यामुळे देशावर हि परिस्थिती ओढावली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शनिवारी घनसावंगी येथे दाखल झाली होती. यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना जयंत पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही मंदीची लाट होती. परंतु, त्यात नोकऱ्यांवर गदा आली नव्हती. नोटबंदी, जीएसटी यामुळे आज उद्योग, व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.शेतकºयानंतर आता कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. असे असले तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सैरभैर होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष नव्या उमेदीने उभारी घेईल, यात शंका नसल्याचे सांगून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर आजही लोकांचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.यावेळी रूपाली चाकणकर यांनीही मार्गदर्शन केले. राज्यात महिला सुरक्षीत नसल्याचे सांगून अन्याय-अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, खा. अमोल कोल्हे, माजी आ. संजय वाघचौरे, उमेश पाटील, अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, महेबूब शेख, विक्रम पडवळ, अमोल मिटकरी, उत्तम पवार, तात्यासाहेब उडाण, बबलू चौधरी, अमरसिंह खरात, जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे, कल्याण सपाटे, सतीश हांडे आदींची उपस्थिती होती.सुडाचे राजकारण केले नाही : टोपेप्रास्ताविकात बोलताना माजी आमदार राजेश टोपे म्हणाले की, आपण कधीच सुडाचे राजकारण केले नाही. जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. पाच वर्षात संघर्ष करून निधी मिळविला.तसेच पीकविमा मिळावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या योजनांवर टीका केली.

टॅग्स :JalanaजालनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलRajesh Topeराजेश टोपे