शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रिमझिम पावसामुळे जालना जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:54 IST

जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवडीची लगबग सुरु केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवडीची लगबग सुरु केली आहे. तर भोकरदन व जाफराबाद तालुक्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.जून च्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळे काही शेतक-यांनी कपाशीची लागवड व पेरणी केली होती. परंतु, त्या गेल्या पावसाने १५ ते २० दिवस उघडीप दिली. परिणामी शेतक-यांनी लागवड केलेली पिके करपून गेली. तसेच तीव्र पाणीटंचाईचे सावटही उभे राहिले होते. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. मात्र, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, मंठा, बदनापूर, घनसावंगी या तालुक्यामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत पडल्याने बळीराजा सुखावला असून, राहिलेल्या शेतक-यांनी पेरणी व कपाशीची लागवड सुरु केली आहे. काही भागामध्ये सध्या पेरणीत आणि कपाशी लागवड करण्यात मग्न असल्याचे दिसून आले.पावसाची प्रतीक्षाजिल्ह्यातील इतर तालुक्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु असून येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरण्या व लागवडीत गुंतला आहे. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद हे तालुके चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असून येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी