शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

Drought In Marathwada : पाण्याअभावी पांढरे सोने काळवंडले, सोयाबीनही करपले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:37 IST

दुष्काळवाडा : मंठा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरणीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने उमरखेडा परिसरात पाहणी केल्यानंतर हे दुष्काळचित्र समोर आले.

- पांडुरंग खराबे, उमरखेडा, ता. मंठा, जि. जालना

मंठा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरणीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने उमरखेडा परिसरात पाहणी केल्यानंतर हे दुष्काळचित्र समोर आले. या गावालगत मोठा डोंगरपट्टा आहे. पावसाअभावी सोयाबीन करपले असून कपाशी जळत आहे. बाजरीचे पीक हातभरच वाढले असून, तूर फुलाविनाच दोन दोन फुटांवर थांबली आहे. खरीप गेले आता रबीची पेरणी होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.  मंठा तालुक्यातील ११७ गावांपैकी सर्वच गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे संपूर्ण तालुकाच दुष्काळाच्या छायेत आहे. जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी कपाशीसह सोयाबीन, तूर, बाजरीची पेरणी केली. नंतर पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन करपले. कापूस दोन फुटांपेक्षा जास्त वाढला नाही. बाकी पिकांची स्थिती तशीच आहे. त्यातच विहिरींचे पाणी वाढले नाही. नदी, नाल्यांना पाणी नाही. भविष्यात पाऊस पडला नाही तर माणसाला व जनावरांना पिण्याचे पाणीही मिळणार नाही. 

उमरखेडा गावाजवळूनच वाहणारी तळतोंडी येथील नदी कोरडीठाक असून, मंठा नदीही पाण्याच्या शोधात आहे. पाझर तलावही पूर्णपणे आटले आहेत. डोंगरभाग असल्याने पावसाळ्यातच सर्वत्र उन्हाळा दिसत आहे. पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोयाबीनला एकरी तीन क्विंटलपेक्षा जास्त उतारा नाही. हे गाव शंभरटक्के शेतीवर व शेतमजुरीवर अवलंबून आहे. 

पाऊस कमी आणि त्यातच कपाशीवर बोंडअळीने हल्ला चढविल्याने उत्पादन घटणार आहे. बोंडअळीनंतर आता कपाशी काढणीला आली आहे. असे असतानाच थ्रीप्स या रोगाचाही प्रभाव वाढल्याचे चित्र आहे. एकुणच शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. मंठा तालुक्यात सरासरी ५३३ मि.मी. पाऊस पडला असून, तो वार्षिक सरासरीपेक्षा कमी आहे. पावसाची सरासरी ५३३ असली तरी जून, जुलै महिन्यात पाऊस झाला. नंतर तो बरसलाच नसल्याने पिके वाया गेली आहेत.

उमरखेड दृष्टीक्षेपात ९०४ हेक्टर - पेरणी यीग्य क्षेत्र ८५० हेक्टर - खरीपाची पेरणी झाली ३०० हेक्टर - कपाशीचे क्षेत्र ३५० हेक्टर - सोयाबीन क्षेत्र ४४. ५४ - एकूण पैसेवारी ११३ - महसुली गावे 

खरीप गेले, रबीचे अवघडउमरखेडा परिसरासह मंठा तालुक्यातील अन्य गावांमध्येही भयावह चित्र आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले. बोंडअळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कामगंध सापळे मोठ्या प्रमाणावर बसवून या अळीला रोखण्यासाठी आम्ही थेट बांधावर गेलो होतो; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता खरिपाप्रमाणेच रबीची पेरणी करण्यासाठीचे पोषक वातावरण नसल्याचे वास्तव आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश आले नाहीत. - एस.डी. गोंधणे, तालुका कृषी     अधिकारी, मंठा 

बळीराजा काय म्हणतो?- पाऊस न पडल्याने हातचे पीक गेले. सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने संपूर्ण कर्ज माफ करायला पाहिजे. - काशीनाथ जाधव

- महागडा खर्च करून काहीच उपयोग झाला नाही. अनेकांना गाव सोडून पोट भरण्यासाठी मुंबई, पुण्याला जावे लागणार आहे. - नारायण डोंबे 

- यावर्षी पाऊस नसल्याने आमचे सोयाबीन गेले. कापूसही वाढला नाही. त्यामुळे उसनवारी कोणी करीत नाही. आज आठवडी बाजार असल्याने पैशाअभावी बाजाराची थैली रिकामीच आणावी लागली. - पार्वतीबाई खेत्रे 

- यावर्षी पावसाने दगा दिल्याने पेरणीचा खर्च वाया गेला. सोयाबीनला उतारा नाही आणि भावही नाही. त्यामुळे काय करावे, कळेना. - आनंद जाधव 

- आमच्या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यातच आमचे गाव डोंगराळ भागात येत असल्याने पिके जळून खाक झाली आहेत. शासनाने रोजगार हमीचे कामे सुरू करावी. - गणेश पवार

- माझी कोरडवाहू शेती आहे. सोयाबीनला एकरी तीन क्विंटलचा उतारा आला. खर्चही फिटला नाही. कपाशी पूर्ण वाळत आहे. बाकी पिकांची स्थिती तशीच आहे. - आसाराम खेत्रे 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र