शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Drought In Marathwada : पाण्याअभावी पांढरे सोने काळवंडले, सोयाबीनही करपले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:37 IST

दुष्काळवाडा : मंठा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरणीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने उमरखेडा परिसरात पाहणी केल्यानंतर हे दुष्काळचित्र समोर आले.

- पांडुरंग खराबे, उमरखेडा, ता. मंठा, जि. जालना

मंठा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरणीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने उमरखेडा परिसरात पाहणी केल्यानंतर हे दुष्काळचित्र समोर आले. या गावालगत मोठा डोंगरपट्टा आहे. पावसाअभावी सोयाबीन करपले असून कपाशी जळत आहे. बाजरीचे पीक हातभरच वाढले असून, तूर फुलाविनाच दोन दोन फुटांवर थांबली आहे. खरीप गेले आता रबीची पेरणी होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.  मंठा तालुक्यातील ११७ गावांपैकी सर्वच गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे संपूर्ण तालुकाच दुष्काळाच्या छायेत आहे. जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी कपाशीसह सोयाबीन, तूर, बाजरीची पेरणी केली. नंतर पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन करपले. कापूस दोन फुटांपेक्षा जास्त वाढला नाही. बाकी पिकांची स्थिती तशीच आहे. त्यातच विहिरींचे पाणी वाढले नाही. नदी, नाल्यांना पाणी नाही. भविष्यात पाऊस पडला नाही तर माणसाला व जनावरांना पिण्याचे पाणीही मिळणार नाही. 

उमरखेडा गावाजवळूनच वाहणारी तळतोंडी येथील नदी कोरडीठाक असून, मंठा नदीही पाण्याच्या शोधात आहे. पाझर तलावही पूर्णपणे आटले आहेत. डोंगरभाग असल्याने पावसाळ्यातच सर्वत्र उन्हाळा दिसत आहे. पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोयाबीनला एकरी तीन क्विंटलपेक्षा जास्त उतारा नाही. हे गाव शंभरटक्के शेतीवर व शेतमजुरीवर अवलंबून आहे. 

पाऊस कमी आणि त्यातच कपाशीवर बोंडअळीने हल्ला चढविल्याने उत्पादन घटणार आहे. बोंडअळीनंतर आता कपाशी काढणीला आली आहे. असे असतानाच थ्रीप्स या रोगाचाही प्रभाव वाढल्याचे चित्र आहे. एकुणच शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. मंठा तालुक्यात सरासरी ५३३ मि.मी. पाऊस पडला असून, तो वार्षिक सरासरीपेक्षा कमी आहे. पावसाची सरासरी ५३३ असली तरी जून, जुलै महिन्यात पाऊस झाला. नंतर तो बरसलाच नसल्याने पिके वाया गेली आहेत.

उमरखेड दृष्टीक्षेपात ९०४ हेक्टर - पेरणी यीग्य क्षेत्र ८५० हेक्टर - खरीपाची पेरणी झाली ३०० हेक्टर - कपाशीचे क्षेत्र ३५० हेक्टर - सोयाबीन क्षेत्र ४४. ५४ - एकूण पैसेवारी ११३ - महसुली गावे 

खरीप गेले, रबीचे अवघडउमरखेडा परिसरासह मंठा तालुक्यातील अन्य गावांमध्येही भयावह चित्र आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले. बोंडअळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कामगंध सापळे मोठ्या प्रमाणावर बसवून या अळीला रोखण्यासाठी आम्ही थेट बांधावर गेलो होतो; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता खरिपाप्रमाणेच रबीची पेरणी करण्यासाठीचे पोषक वातावरण नसल्याचे वास्तव आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश आले नाहीत. - एस.डी. गोंधणे, तालुका कृषी     अधिकारी, मंठा 

बळीराजा काय म्हणतो?- पाऊस न पडल्याने हातचे पीक गेले. सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने संपूर्ण कर्ज माफ करायला पाहिजे. - काशीनाथ जाधव

- महागडा खर्च करून काहीच उपयोग झाला नाही. अनेकांना गाव सोडून पोट भरण्यासाठी मुंबई, पुण्याला जावे लागणार आहे. - नारायण डोंबे 

- यावर्षी पाऊस नसल्याने आमचे सोयाबीन गेले. कापूसही वाढला नाही. त्यामुळे उसनवारी कोणी करीत नाही. आज आठवडी बाजार असल्याने पैशाअभावी बाजाराची थैली रिकामीच आणावी लागली. - पार्वतीबाई खेत्रे 

- यावर्षी पावसाने दगा दिल्याने पेरणीचा खर्च वाया गेला. सोयाबीनला उतारा नाही आणि भावही नाही. त्यामुळे काय करावे, कळेना. - आनंद जाधव 

- आमच्या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यातच आमचे गाव डोंगराळ भागात येत असल्याने पिके जळून खाक झाली आहेत. शासनाने रोजगार हमीचे कामे सुरू करावी. - गणेश पवार

- माझी कोरडवाहू शेती आहे. सोयाबीनला एकरी तीन क्विंटलचा उतारा आला. खर्चही फिटला नाही. कपाशी पूर्ण वाळत आहे. बाकी पिकांची स्थिती तशीच आहे. - आसाराम खेत्रे 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र