शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Drought In Marathwada : पाण्याअभावी पांढरे सोने काळवंडले, सोयाबीनही करपले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:37 IST

दुष्काळवाडा : मंठा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरणीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने उमरखेडा परिसरात पाहणी केल्यानंतर हे दुष्काळचित्र समोर आले.

- पांडुरंग खराबे, उमरखेडा, ता. मंठा, जि. जालना

मंठा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरणीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने उमरखेडा परिसरात पाहणी केल्यानंतर हे दुष्काळचित्र समोर आले. या गावालगत मोठा डोंगरपट्टा आहे. पावसाअभावी सोयाबीन करपले असून कपाशी जळत आहे. बाजरीचे पीक हातभरच वाढले असून, तूर फुलाविनाच दोन दोन फुटांवर थांबली आहे. खरीप गेले आता रबीची पेरणी होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.  मंठा तालुक्यातील ११७ गावांपैकी सर्वच गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे संपूर्ण तालुकाच दुष्काळाच्या छायेत आहे. जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी कपाशीसह सोयाबीन, तूर, बाजरीची पेरणी केली. नंतर पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन करपले. कापूस दोन फुटांपेक्षा जास्त वाढला नाही. बाकी पिकांची स्थिती तशीच आहे. त्यातच विहिरींचे पाणी वाढले नाही. नदी, नाल्यांना पाणी नाही. भविष्यात पाऊस पडला नाही तर माणसाला व जनावरांना पिण्याचे पाणीही मिळणार नाही. 

उमरखेडा गावाजवळूनच वाहणारी तळतोंडी येथील नदी कोरडीठाक असून, मंठा नदीही पाण्याच्या शोधात आहे. पाझर तलावही पूर्णपणे आटले आहेत. डोंगरभाग असल्याने पावसाळ्यातच सर्वत्र उन्हाळा दिसत आहे. पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोयाबीनला एकरी तीन क्विंटलपेक्षा जास्त उतारा नाही. हे गाव शंभरटक्के शेतीवर व शेतमजुरीवर अवलंबून आहे. 

पाऊस कमी आणि त्यातच कपाशीवर बोंडअळीने हल्ला चढविल्याने उत्पादन घटणार आहे. बोंडअळीनंतर आता कपाशी काढणीला आली आहे. असे असतानाच थ्रीप्स या रोगाचाही प्रभाव वाढल्याचे चित्र आहे. एकुणच शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. मंठा तालुक्यात सरासरी ५३३ मि.मी. पाऊस पडला असून, तो वार्षिक सरासरीपेक्षा कमी आहे. पावसाची सरासरी ५३३ असली तरी जून, जुलै महिन्यात पाऊस झाला. नंतर तो बरसलाच नसल्याने पिके वाया गेली आहेत.

उमरखेड दृष्टीक्षेपात ९०४ हेक्टर - पेरणी यीग्य क्षेत्र ८५० हेक्टर - खरीपाची पेरणी झाली ३०० हेक्टर - कपाशीचे क्षेत्र ३५० हेक्टर - सोयाबीन क्षेत्र ४४. ५४ - एकूण पैसेवारी ११३ - महसुली गावे 

खरीप गेले, रबीचे अवघडउमरखेडा परिसरासह मंठा तालुक्यातील अन्य गावांमध्येही भयावह चित्र आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले. बोंडअळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कामगंध सापळे मोठ्या प्रमाणावर बसवून या अळीला रोखण्यासाठी आम्ही थेट बांधावर गेलो होतो; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता खरिपाप्रमाणेच रबीची पेरणी करण्यासाठीचे पोषक वातावरण नसल्याचे वास्तव आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश आले नाहीत. - एस.डी. गोंधणे, तालुका कृषी     अधिकारी, मंठा 

बळीराजा काय म्हणतो?- पाऊस न पडल्याने हातचे पीक गेले. सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने संपूर्ण कर्ज माफ करायला पाहिजे. - काशीनाथ जाधव

- महागडा खर्च करून काहीच उपयोग झाला नाही. अनेकांना गाव सोडून पोट भरण्यासाठी मुंबई, पुण्याला जावे लागणार आहे. - नारायण डोंबे 

- यावर्षी पाऊस नसल्याने आमचे सोयाबीन गेले. कापूसही वाढला नाही. त्यामुळे उसनवारी कोणी करीत नाही. आज आठवडी बाजार असल्याने पैशाअभावी बाजाराची थैली रिकामीच आणावी लागली. - पार्वतीबाई खेत्रे 

- यावर्षी पावसाने दगा दिल्याने पेरणीचा खर्च वाया गेला. सोयाबीनला उतारा नाही आणि भावही नाही. त्यामुळे काय करावे, कळेना. - आनंद जाधव 

- आमच्या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यातच आमचे गाव डोंगराळ भागात येत असल्याने पिके जळून खाक झाली आहेत. शासनाने रोजगार हमीचे कामे सुरू करावी. - गणेश पवार

- माझी कोरडवाहू शेती आहे. सोयाबीनला एकरी तीन क्विंटलचा उतारा आला. खर्चही फिटला नाही. कपाशी पूर्ण वाळत आहे. बाकी पिकांची स्थिती तशीच आहे. - आसाराम खेत्रे 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र