शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळाकडे होत आहे दुर्लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:30 IST

जाफराबाद तालुक्यात पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरीप हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु, त्या करिता लागणा-या उपाय योजनांकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या जाफराबाद तालुक्यात आहे.कमी पावसाअभावी खरीप हंगामात येणारे मका पीक आणि रबी हंगामातील शाळू ज्वारी पिकाची लागवड शेतकऱ्यांना करता आली नाही. म्हणून चा-याचे भाव गगनाला भिडले आहे. जाफराबाद तालुक्यात चा-याचे भाव प्रति शेकडा तीन हजार रुपये होऊन सुद्धा चारा मिळत नाही. त्यामुळे जनावरांसाठी लागणा-या चा-याची सुध्दा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी चा-यासाठी शोधा- शोध करत आहेत. दुष्काळी अनुषंगाने इतर जिल्ह्यात जनावरांकरिता शासनाने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. परंतु, जालना जिल्ह्यात अद्यापही चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाही.जाफराबाद तालुक्यात अद्यापही चारा छावण्याची मागणी करण्यात आली नसल्याचे तहसील कार्यालयाने सांगितले. दरम्यान, सध्या तालुक्यात लोकसभा निवडणुकीचा धूमाकूळ सुरु आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह प्रशासनही निवडणूकीच्या कामात दंग आहे. परिणामी, तालुक्यात पडलेल्या भीषण दुष्काळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.जाफराबाद तालुक्यात १०१ गावांपैकी ७० गावांत भीषण पाणी टंचाई आहे. ५० गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर २० गावात विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा होत आहे. ७० गावा करिता ७३ खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. असे असले तरी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. काही नागरिकांनी तीन ते चार किलो मीटर पायपीट करावी लागत आहे. याकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत असल्याचे चित्र सध्या जाफराबाद तालुक्यातील आहे.

टॅग्स :droughtदुष्काळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक