शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गरीब मराठ्यांचे"; गॅझेट अंमलबजावणीवर जरांगे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 15:28 IST

हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट हा विषय काही नवीन नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत.

- पवन पवार वडीगोद्री (जालना): राज्यातील मराठा समाजाने आपला हक्क मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे. "कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गोरगरीब मराठ्यांचेच आहे," अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचालीवर घेतली. ते म्हणाले, हैद्राबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवर बोलताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, या गॅझेटचे श्रेय फक्त गोरगरीब मराठ्यांचे आहे आणि हे यश देखील त्यांचेच आहे. तसेच त्यांनी जोरदार इशारा दिला की, मुख्यमंत्र्यांनी, छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री व खासदारांनी मराठा समाजाच्या अपेक्षांशी दगा फटका करू नये. ते अंतरवाली सराटी येथे आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट हा विषय काही नवीन नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत यावर जरांगे म्हणाले. ''या हालचाली ३ महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या होत्या आणि आम्ही यावर आधीपासूनच लक्ष ठेवले आहे," असे ते म्हणाले. या गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे सर्व मराठ्यांना मोठा फायदा होणार आहे. शंभूराज देसाई तीन महिन्यांपासून यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु मराठा समाज एवढ्यावर थांबणार नाही. "आम्हाला केवळ आश्वासन नको आहे, आम्हाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर सोमवारी रात्री १२ वाजेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला.

राज्यात दंगली झाल्या तर फडणीस-भुजबळ जबाबदारमनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "फडणवीस साहेबांना राज्यात रक्तपात घडवायचा आहे आणि मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. जर राज्यात काही दंगे झाले, तर त्यासाठी फडणवीस आणि भुजबळ जबाबदार असतील."

प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकारमराठा आरक्षणाबाबत राज्यात सुरू असलेल्या विविध आंदोलने आणि त्यांच्यावर होणाऱ्या राजकीय हालचालींवर जरांगे पाटील म्हणाले, "राज्यात कोणालाही आंदोलनाचा अधिकार आहे, परंतु माझ्या मराठ्यांना खरचटले देखील नाही पाहिजे." आमच्या मराठ्यांना गाल बोट लागता कामा नये असे स्पष्ट करत जरांगे यांनी शासनाने राजेश्री उंबरे यांना काय आश्वासन दिलय ते त्यांनाच माहिती असे भाष्य केले. तसेच लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणावर भाष्य करताना जरांगे म्हणाले की, उपोषण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना