शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरु नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:49 AM

जालना जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला होता. त्यातील ग्रामीण आणि शहरी अशा एकूण १०२ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. ...

जालना जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला होता. त्यातील ग्रामीण आणि शहरी अशा एकूण १०२ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. या चार महिन्यात दोन लाख नागरिकांनी लस घेतली. परंतु ही लस घेताना मोठा गोंधळ उडाला आहे. ज्यांना पहिला डोस दिला, त्यांच्यासाठी दुसरा डोस राखून ठेवणे आवश्यक होते. परंतु तसे न करता जो येईल त्याला ही लस देत गेल्याने दुसरा डोस पुरविताना आता मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, यामुळे विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप होत आहे.

ग्रामीणमध्ये तर आता एक डोस घेतला आणि दुसरा मिळत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरी भागात मात्र, नागरिक सळो की पळो करून सोडत आहेत.

दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा

दुसरा डोस घेण्यासाठी सरासरी २८ दिवस थांबावे असे निकष होते. परंतु जास्तीत जास्त ४५ दिवस थांबता येते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पहिला आणि दुसरा असे दोन डोस घेतल्यावर तुमच्या प्रतिकारशक्तीत मोठी वाढ होते. यामुळे कोरोना झाल्यावरही तो पाहिजे तेवढा हानिकारक ठरत नाही.

डोसला उशीर झाला तरी घाबरु नका

कोरोनावर ज्या दोन कंपन्यांच्या लसी बाजारात आहेत, त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु पहिला डोस घेतल्यानंतरची मुदत संपल्यावर चिंता व्यक्त होत आहे. परंतु तज्ज्ञ डॉ. संजय जगताप यांनी सांगितले की, २८ दिवस ही एक ढोबळ मुदत होती. परंतु साधारपणे पंधरा ते वीस दिवस उलटून गेल्यावरही घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले.