शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आशेवर राहू नका, मुंबईला जायचे म्हणजे जायचे; बच्चू कडू यांच्या भेटीनंतरही जरांगे पाटील ठाम

By विजय मुंडे  | Updated: January 15, 2024 12:12 IST

बच्चू कडू यांचा मनोज जरांगेंसोबत संवाद; जरांगे पाटील यांनी सूचविले अध्यादेशातील बदल

जालना : नोंदी सापडलेल्यांच्या सग्या-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, याबाबत आ. बच्चू कडू यांच्या मार्फत काही बदल शासनाला सूचविले आहेत. असे असले तरी वेळकाढूणा होवू शकतो. समाज बांधवांनी आशेवर राहू नये, २० जानेवारीला मुंबईला जायचे म्हणजे जायचेच आहे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

शासनाच्या वतीने नव्याने काढण्यात येणाऱ्या अध्यादेशाबाबत आ. बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांची यादी १६ ते १७ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतींवर लावावी, सगे सोयऱ्यांबाबत जे लिहून दिले ते शासनाकडे सादर करू त्यावर काय तोडगा निघेल यावर पाहू. मुळात प्रशासन हे मोठी अडचण आहे. त्याला वठणीवर आणून काम करून घेणे गरजेचे आहे. १८ ते १९ जानेवारीस जी अधिसूचना निघतेय त्यात त्र्यंबकेश्वर, राक्षसभुवन, लसीकरणाच्या नोंदी त्या अधिसूचनेत आल्या तर अधिक सोपे होईल, यावर मुख्यमंत्र्यांची यांची भेट घेवू. काय तोडगा निघतेय ते पाहू त्यांचे प्रत्येक शब्द घेवून चर्चा करू असे आ. बच्चू कडू म्हणाले.

ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र वितरित करावे, ग्रामपंचायतींना यादी लावावी, सगेसोयरे शब्दा आणि मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे यावर चर्चा झाली. सापडलेल्या नोंदी ज्या जतन करून ठेवा, ३३/३४ गाव नमुना नोंदी घेणे, १४ नंबर, दैवतांच्या संस्थानच्या नोंदींवर चर्चा झाली. केवळ चर्चा नव्हे तर २० तारखेच्या आत हे सर्व करून शासन निर्णय किंवा कायदा पारित करावा, असे सांगितले आहे. चर्चा सुरू राहतील. वेळकाढूपणा होवू शकतो. त्यामुळे काहीही होवो २० जानेवारीला मुंबईत जायचे म्हणजे जायचे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

२० नंतर मी आंदोलनात: बच्चू कडूमराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपणही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. अधिवेशनातही आवाज उठविला आहे. शासन प्रतिनिधी म्हणून आज आलो असलो तरी २० तारखेपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मी स्वत: आंदोलनात उतरणार असल्याची भूमिका आ. बच्चू कडू यांनी यावेळी जाहीर केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणBacchu Kaduबच्चू कडू