शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

शिकलेली माणसंच भेद करतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:31 IST

जाती पातीच्या भिंती पाडून सर्वांनी एकदिलाने एकत्र येऊन सुखाने नांदावे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी येथे बोलताना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प. पू. मन्मथ स्वामींनी कधीच जात- पात मानली नाही, अशा प्रकारचा भेदा-भेद त्यांना कदापिही मान्य नव्हता. म्हणूनच अनेक प्रकारच्या रचना त्यांनी लिहून हा भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज माणसं आप- पर असा भेद करु लागली आहेत. फाटक्या- तुटक्यांचं सोडा, परंतु शिकली सवरलेली माणसंच अशा प्रकारचा भेद निर्माण करण्यात सर्वात पुढे आहेत. मात्र जाती पातीच्या भिंती पाडून सर्वांनी एकदिलाने एकत्र येऊन सुखाने नांदावे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी येथे बोलताना दिला.अंबड रोडवरील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिर परिसरात अखंड शिवनाम सप्ताहातील संगीतमय शिवकथेचे चौथे पुष्प गुंफताना कस्तुरे महाराज बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, संतांकडे विवेक बुध्दी होती. आपण विवेक गहाण तर टाकला नाही, अशी शंका येऊ लागली आहे. ज्यांच्याकडे विवेकपूर्ण बुध्दी आहे. ती माणसं आजही सुखाचा संसार करतात आणि जे संसारात सुखी आहेत, तेच परमार्थ चांगला करतात. फुकट काहीही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी श्रम करावे लागतात. स्वातंत्र्य देखील फुकट मिळालेलं नाही. तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूँंगा, असं सुभाषचंद्र बोस म्हणाले होते. देवही फुकट मिळत नाही किंवा भेटत नाही. फरक एवढाच की देवाला प्राप्त करुन घेण्यासाठी पैसा लागत नाही. देव आप- पर असा भेद करत नाही. तो फाटक्या- तुटक्यांसाठी जसा आहे तसा तो पैसेवाल्यांसाठीही आहे. मात्र तुम्ही किती श्रीमंत, तुमच्या अंगावर किती भारी कपडे आहेत, हेही देव पाहात नाही. देव फक्त भक्तीचा भुकेलेला आहे. जन्मभरीच्या श्वासाइतके घेतले हरिनाम.. बाई मी विकत घेतला शाम... हे भक्तीही महाराजांनी आपल्या पहाडी आणि भारदस्त आवाजात गाऊन दाखवले.जेथे भेद येतो, तेथे दु:खही येते. आपल्या पुत्रासाठी कैकयी मातेने जे जग जाहीर केले त्याने संपूर्ण अयोध्यानगरी दु:खात बुडून गेली. मात्र, भरताने कधीही गादीचा हव्यास केला नाही. चौदा वर्षे त्याने रामाच्या पादुकांची पूजा केली. हा त्याग भरताकडे होता. म्हणून त्याला दु:खाने वेढले नाही. इकडे कैकयीची इच्छापूर्ती होऊनही ती दु:खाने व्यापून गेलेली होती. अर्थात भेद आला की दु:ख येतेच, असे कस्तुरे म्हणाले.बायका कधीही घर फोडत नाहीत. त्यांच्यावर नको तो आरोप करण्यात येतो. बायकांनी घरे फोडली असती तर भरतानं राजगादीचा त्याग केला असता का ? जोपर्यंत माणसं खंबीरपणे भूमिकेवर ठाम असतात, तोपर्यंत बायकांनीही काहीही सांगू द्या, काहीही होत नाही.माणसं आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत म्हणून बायका घर फोडतात, असे म्हटले जाते. मात्र त्यात तथ्य नाही. असल्या फालतू भानगडीत वेळ घालवण्यापेक्षा चांगली स्वप्ने पाहा. स्वप्ने पाहण्यासाठी पैसा लागत नाही. मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, तो मुख्यमंत्री- पंतप्रधान झाला पाहिजे, अशी स्वप्ने बघा.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक