शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

भाजप - शिवसेनेच्या भूलथापांना जुमानू नका- कैलास गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:35 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजप आणि शिवसेना हे दोन्हीही पक्ष जातीयवादी आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी धर्मनिरपेक्षेला प्राधान्य देणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.मंगळवारी जुना जालना भागातील दु:खीनगर येथे सायंकाळी कॉर्नर बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी सभापती भीमराव डोंगरे, एकबाल पाशा, शाह आलम खान, डॉ. संजय लाखे पाटील, कल्याण दळे, शेख महेमूद, राजेंद्र जाधव, मनकर्णा डांगे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी कैलास गोरंट्याल यांनी दानवे-खोतकर यांच्यातील वाद म्हणजे नुरा कुस्ती होती असे सांगून हा वाद कसा मिटला आणि त्यासाठी कसे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाले, याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही गोरंट्याल यांनी केला. आ. सत्तार यांच्या भूमिकेवरही गोरंट्याल यांनी टीका केली.यावेळी राजाभाऊ देशमुख, डॉ. लाखे पाटील यांनीही विचार व्यक्त केले. विलास औताडे हे प्रामाणिक आणि काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे नेते आहेत त्यामुळे त्यांना मतदारांनी आगामी काळात संधी द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अहोरात्र परिश्रम घेवून औताडे यांना विजयी करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात एकबाल पाशा यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सूत्रसंचालन शेख महेमूद यांनी केले. यावेळी कल्याण दळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाcongressकाँग्रेस