शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या कुठल्याच विभागातील अधिकारी वेळेवर कामे करीत नाहीत. पाणीटंचाई असो की सिंचन सर्वच विभागात मनमानी सुरू आहे. सदस्यांनी मागितलेली माहिती सभागृहात देण्याऐवजी वेळ मारून नेली जाते. याच मुद्यावर स्थायी समितीच्या सभेत विरोधकांनी सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांना धारेवर धरले. अधिका-यांना पाठीशी न घालता चुकीचे काम करणा-यांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या कुठल्याच विभागातील अधिकारी वेळेवर कामे करीत नाहीत. पाणीटंचाई असो की सिंचन सर्वच विभागात मनमानी सुरू आहे. सदस्यांनी मागितलेली माहिती सभागृहात देण्याऐवजी वेळ मारून नेली जाते. याच मुद्यावर स्थायी समितीच्या सभेत विरोधकांनी सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांना धारेवर धरले. अधिका-यांना पाठीशी न घालता चुकीचे काम करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली.दुपारी साडेतीन वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुुरुवात झाली. उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्तात्रय बनसोडे, जिजाबाई कळंबे, सुमनबाई घुगे, राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखा व वित्ताधिकारी उत्तम चव्हाण आदींची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच सदस्य अवधूत खडके यांनी मागील सभेतील मुद्यांचा कार्यवृत्तांत समावेश न केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वारंवार निदर्शनास आणूनही असेच प्रकार घडत असल्याने सभेचे व्हिडिओ चित्रकरण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, अध्यक्षांनी यास नकार दिला.शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जयंती कार्यक्रम साजरा करण्याचे पत्रक काढणारे प्राथमिक शिक्षणाकिधारी पांडुरंग कवाणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खडके यांनी केली. ही अनवधानाने झालेली चूक लगेच दुरुस्त करण्यात आली. त्याबद्दल सभागृहात माफी मागतो, असे अध्यक्ष खोतकर सभागृहात म्हणाले. तर या पुढे अशी चूक झाल्यास संबंधित अधिका-यास कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल, असे मुख्याधिकारी आरोरा यांनी सांगितले. सिंचन विभागाने पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीवर अद्यापही शासनाचे नाव लागलेले नाही. प्रत्येक सभेत हा मुद्दा उपस्थित करूनही काहीच कार्यवाही झाली नाही. यामध्ये वैयक्तिक कुठलाही स्थार्थ नाही. मात्र, अधिकारी काहीच काम करत नसतील तर त्यांना घरी बसवावे, अशी मागणी सदस्य शालिग्राम म्हस्के यांनी केले. उपाध्यक्ष टोपे यांनी याच मुद्यावर सिंचन विभागाने अभियंता अशपाक यांना चांगलेच धारेवर धरले. मार्चअखेर सुरू असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे काहीच नियोजन नाही. परस्पर ७२ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रस्ताव मंजूर करताना विश्वासात कुणालाच विश्वास घेतले नाही या मुद्यावरही म्हस्के यांनी आक्षेप घेतला. नुकत्याच शिक्षण विभागाने क्रीडा स्पर्धा घेतल्या.या स्पर्धा उन्हाळ्यात व परीक्षा काळात न घेता नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात घेतल्या जाव्यात, अशी मागणी बप्पासाहेब गोल्डे यांनी सभागृहात केली. तर जिल्हा परिषद शाळेसाठी मंठा चौफुली परिसरात अनेक वर्षांपासून संपादित जागेवर काहीच झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या मालकीची ही जागा बेवारस पडली आहे. याबाबत उचित निर्णय घेतला जावा, असे जयमंगल जाधव यांनी सभागृहात सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliticsराजकारण