शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या कुठल्याच विभागातील अधिकारी वेळेवर कामे करीत नाहीत. पाणीटंचाई असो की सिंचन सर्वच विभागात मनमानी सुरू आहे. सदस्यांनी मागितलेली माहिती सभागृहात देण्याऐवजी वेळ मारून नेली जाते. याच मुद्यावर स्थायी समितीच्या सभेत विरोधकांनी सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांना धारेवर धरले. अधिका-यांना पाठीशी न घालता चुकीचे काम करणा-यांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या कुठल्याच विभागातील अधिकारी वेळेवर कामे करीत नाहीत. पाणीटंचाई असो की सिंचन सर्वच विभागात मनमानी सुरू आहे. सदस्यांनी मागितलेली माहिती सभागृहात देण्याऐवजी वेळ मारून नेली जाते. याच मुद्यावर स्थायी समितीच्या सभेत विरोधकांनी सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांना धारेवर धरले. अधिका-यांना पाठीशी न घालता चुकीचे काम करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली.दुपारी साडेतीन वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुुरुवात झाली. उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्तात्रय बनसोडे, जिजाबाई कळंबे, सुमनबाई घुगे, राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखा व वित्ताधिकारी उत्तम चव्हाण आदींची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच सदस्य अवधूत खडके यांनी मागील सभेतील मुद्यांचा कार्यवृत्तांत समावेश न केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वारंवार निदर्शनास आणूनही असेच प्रकार घडत असल्याने सभेचे व्हिडिओ चित्रकरण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, अध्यक्षांनी यास नकार दिला.शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जयंती कार्यक्रम साजरा करण्याचे पत्रक काढणारे प्राथमिक शिक्षणाकिधारी पांडुरंग कवाणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खडके यांनी केली. ही अनवधानाने झालेली चूक लगेच दुरुस्त करण्यात आली. त्याबद्दल सभागृहात माफी मागतो, असे अध्यक्ष खोतकर सभागृहात म्हणाले. तर या पुढे अशी चूक झाल्यास संबंधित अधिका-यास कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल, असे मुख्याधिकारी आरोरा यांनी सांगितले. सिंचन विभागाने पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीवर अद्यापही शासनाचे नाव लागलेले नाही. प्रत्येक सभेत हा मुद्दा उपस्थित करूनही काहीच कार्यवाही झाली नाही. यामध्ये वैयक्तिक कुठलाही स्थार्थ नाही. मात्र, अधिकारी काहीच काम करत नसतील तर त्यांना घरी बसवावे, अशी मागणी सदस्य शालिग्राम म्हस्के यांनी केले. उपाध्यक्ष टोपे यांनी याच मुद्यावर सिंचन विभागाने अभियंता अशपाक यांना चांगलेच धारेवर धरले. मार्चअखेर सुरू असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे काहीच नियोजन नाही. परस्पर ७२ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रस्ताव मंजूर करताना विश्वासात कुणालाच विश्वास घेतले नाही या मुद्यावरही म्हस्के यांनी आक्षेप घेतला. नुकत्याच शिक्षण विभागाने क्रीडा स्पर्धा घेतल्या.या स्पर्धा उन्हाळ्यात व परीक्षा काळात न घेता नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात घेतल्या जाव्यात, अशी मागणी बप्पासाहेब गोल्डे यांनी सभागृहात केली. तर जिल्हा परिषद शाळेसाठी मंठा चौफुली परिसरात अनेक वर्षांपासून संपादित जागेवर काहीच झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या मालकीची ही जागा बेवारस पडली आहे. याबाबत उचित निर्णय घेतला जावा, असे जयमंगल जाधव यांनी सभागृहात सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliticsराजकारण