शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

दुष्काळाला घाबरुन जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:43 IST

शासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत असून जिल्ह्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा असे अनेक गंभीर प्रश्न आपल्या समोर आहेत. अशा गंभीर परिस्थितीत धीर सोडता कामा नये. शासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.ते माळी महासंघ चंदनझिरा शाखेच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, रशिद पहेलवान, गणेश राऊत, सतिष जाधव, संतोष मोहिते आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, सणवार व अनेक रुढी यांवर अनाठायी होणारा खर्च कमी करुन शिक्षण, आरोग्य अशा आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे. पूर्वीच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा देतांना ते म्हणाले की, समाजात व कुटूंबात एकोपा, संस्कार, शिस्त, सामंजस्य हवे तरच कुटूंबाचा व समाजाचा विकास होऊ शकतो. आजही आपण नाहक अनेक कर्मकांडांत गुंतलो असून त्यामुळे पाहिजे त्याप्रमाणात प्रगती होऊ शकलेली नाही, असेही ते म्हणाले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, सध्याच्या यांत्रिक युगात माणूस यंत्रासारखा वागत आहे. मनुष्य प्राण्याला भाव भावना असतात. यामध्ये प्रेम, स्नेह भावना जर भावनाच संपल्या तर आपले सर्व सामाजिक स्वास्त्य व समाज रचनाच बिघडून जाईल ही परिस्थितीच आज निर्माण होत आहे. मोठ्या शहरांमध्ये शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणारा जर मृत्यूुखी पडला तर घरातून दुर्गंधी येईपर्यंत शेजाऱ्याला कळत नाही. रस्त्यावर एखादा अपघात झाला तर मदतीची याचना करणारा अनेक वाटसरुंना हात करतो पण प्रत्येकाला वेळ नसल्यामुळे कुणीही थांबायला तयार होत नाही. रस्त्यावर एखाद्याचे भांडण होत असेल तर सोडवायला कुणी जात नाही. इतका अलिप्तपणाने आज माणूस वागत आहे. यावेळी राजेश राऊत, रशिद पहेलवान, गणेश राऊत यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संतोष जमधडे, राजेंद्र जाधव, जे.के. चव्हाण, गणेश चव्हाण, रितेश पंचारिया, एकनाथ गायकवाड, राजकुमार बुलबुले, रवि तारो, मुवूंष्ठद खरात, संतोष रासवे, विठ्ठलराव दैने, रामेश्वर गाडेकर, सुनिल साबळे, गणेश तांबेकर, आयोजक सचिन दैने, अ?ॅड. दिनेश दैने, भगवान दैने, संतोष काळे, विष्णू तायडे, डॉ. मगर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक खरात यांनी तर सूत्रसंचालन गाडेकर यांनी केले.

टॅग्स :droughtदुष्काळArjun Khotkarअर्जुन खोतकर