शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाला घाबरुन जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:43 IST

शासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत असून जिल्ह्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा असे अनेक गंभीर प्रश्न आपल्या समोर आहेत. अशा गंभीर परिस्थितीत धीर सोडता कामा नये. शासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.ते माळी महासंघ चंदनझिरा शाखेच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, रशिद पहेलवान, गणेश राऊत, सतिष जाधव, संतोष मोहिते आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, सणवार व अनेक रुढी यांवर अनाठायी होणारा खर्च कमी करुन शिक्षण, आरोग्य अशा आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे. पूर्वीच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा देतांना ते म्हणाले की, समाजात व कुटूंबात एकोपा, संस्कार, शिस्त, सामंजस्य हवे तरच कुटूंबाचा व समाजाचा विकास होऊ शकतो. आजही आपण नाहक अनेक कर्मकांडांत गुंतलो असून त्यामुळे पाहिजे त्याप्रमाणात प्रगती होऊ शकलेली नाही, असेही ते म्हणाले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, सध्याच्या यांत्रिक युगात माणूस यंत्रासारखा वागत आहे. मनुष्य प्राण्याला भाव भावना असतात. यामध्ये प्रेम, स्नेह भावना जर भावनाच संपल्या तर आपले सर्व सामाजिक स्वास्त्य व समाज रचनाच बिघडून जाईल ही परिस्थितीच आज निर्माण होत आहे. मोठ्या शहरांमध्ये शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणारा जर मृत्यूुखी पडला तर घरातून दुर्गंधी येईपर्यंत शेजाऱ्याला कळत नाही. रस्त्यावर एखादा अपघात झाला तर मदतीची याचना करणारा अनेक वाटसरुंना हात करतो पण प्रत्येकाला वेळ नसल्यामुळे कुणीही थांबायला तयार होत नाही. रस्त्यावर एखाद्याचे भांडण होत असेल तर सोडवायला कुणी जात नाही. इतका अलिप्तपणाने आज माणूस वागत आहे. यावेळी राजेश राऊत, रशिद पहेलवान, गणेश राऊत यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संतोष जमधडे, राजेंद्र जाधव, जे.के. चव्हाण, गणेश चव्हाण, रितेश पंचारिया, एकनाथ गायकवाड, राजकुमार बुलबुले, रवि तारो, मुवूंष्ठद खरात, संतोष रासवे, विठ्ठलराव दैने, रामेश्वर गाडेकर, सुनिल साबळे, गणेश तांबेकर, आयोजक सचिन दैने, अ?ॅड. दिनेश दैने, भगवान दैने, संतोष काळे, विष्णू तायडे, डॉ. मगर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक खरात यांनी तर सूत्रसंचालन गाडेकर यांनी केले.

टॅग्स :droughtदुष्काळArjun Khotkarअर्जुन खोतकर