शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

By विजय मुंडे  | Updated: September 8, 2023 13:02 IST

लोकशाही मार्गाने लढा द्यावा; शासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत.

वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची बाजी लावून अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये, आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. गुन्हे दाखल झाले तर शिक्षणाला आणि नोकरीला अडचण येईल. सर्वांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. 

मराठा समाजाला कुणबी दाखला द्यावा यासाठी जरांगे आणि त्यांचे सहकारी अंतरवाली सराटी गावात अमरण उपोषण करीत आहेत. या उपोषणाच्या दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात आंदोलन सुरू झाले आहे. परंतु काही ठिकाणी हिंसक प्रकारे आंदोलन केले जात असल्याचे दिसून येत आहे. काहींनी आत्महत्या करणे यासह इतर टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील युवकांचे भविष्य घडवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. युवकांनी असे केले तर त्याचा फायदा कोणाला होणार असा सवाल करीत युवकांनी शांततेत आंदोलन करावे, लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अन्यथा पाणी त्याग, उपचार बंदशासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत. काल रात्रीपासून पिशवी भरून तयारीत आहोत. परंतु अद्याप शासनाचा काही निरोप आलेला नाही. आम्ही शासनाला चार दिवसांची मुदत दिली आहे. चार दिवसानंतर मात्र योग्य निर्णय न झाल्यास पाणी त्याग आणि उपचार बंद ही भूमिका कायम राहणार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाState Governmentराज्य सरकार