शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

By विजय मुंडे  | Updated: September 8, 2023 13:02 IST

लोकशाही मार्गाने लढा द्यावा; शासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत.

वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची बाजी लावून अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये, आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. गुन्हे दाखल झाले तर शिक्षणाला आणि नोकरीला अडचण येईल. सर्वांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. 

मराठा समाजाला कुणबी दाखला द्यावा यासाठी जरांगे आणि त्यांचे सहकारी अंतरवाली सराटी गावात अमरण उपोषण करीत आहेत. या उपोषणाच्या दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात आंदोलन सुरू झाले आहे. परंतु काही ठिकाणी हिंसक प्रकारे आंदोलन केले जात असल्याचे दिसून येत आहे. काहींनी आत्महत्या करणे यासह इतर टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील युवकांचे भविष्य घडवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. युवकांनी असे केले तर त्याचा फायदा कोणाला होणार असा सवाल करीत युवकांनी शांततेत आंदोलन करावे, लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अन्यथा पाणी त्याग, उपचार बंदशासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत. काल रात्रीपासून पिशवी भरून तयारीत आहोत. परंतु अद्याप शासनाचा काही निरोप आलेला नाही. आम्ही शासनाला चार दिवसांची मुदत दिली आहे. चार दिवसानंतर मात्र योग्य निर्णय न झाल्यास पाणी त्याग आणि उपचार बंद ही भूमिका कायम राहणार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाState Governmentराज्य सरकार