शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधीं विरोधात जिंकू शकणार नाही...'; फवाद चौधरी यांच्या कौतुकानंतर, हिमंतांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

मतदान यंत्रात छेडछाड अशक्य..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:46 AM

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कुणालाही बाहेरून अथवा आतून काही फेरबदल करणे अगदीच अशक्य आहे, अशी भूमिका भारत निवडणूक आयोगाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजयेंंद्र शुक्ला यांनी मांडली.

जालना : एखाद्या बॅँकेतकॅश केबिनमध्ये रोख रक्कम देण्या-घेण्याच्या कामात गुणाकार, बेरीज, वजाबाकी आणि भागाकार करून वेगात हिशोब करण्यासाठी तिथला कॅशियर जे कॅलक्युलेटर वापरतो, ते कॅलक्युलेटर बाहेर उभ्या असलेल्या एखाद्याने हॅक करून त्यात त्याला पाहिजे तसे फेरबदल करणे जसे अशक्य आहे, अगदी तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कुणालाही बाहेरून अथवा आतून काही फेरबदल करणे अगदीच अशक्य आहे, अशी भूमिका भारत निवडणूक आयोगाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजयेंंद्र शुक्ला यांनी मांडली.येथील जेईएस महाविद्यालयाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी संवाद तसेच विशेष सत्कार समारंभात ते मंगळवारी बोलत होते.व्यासपीठावर मराठवाडा विभागाचे तंत्र शिक्षण खात्याचे सहसंचालक महेश शिवणकर, जेईएस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ. जे. डी. काबरा उपस्थित होते.किल्लेधारूर ते भारतीय निवडणूक आयोग व्हाया जेईएस महाविद्यालय या सगळ्या आपल्या आयुष्यातील प्रवासाचा उलगडा शुक्ला यांनी यावेळी केला.ते म्हणाले की, जेईएस महाविद्यालयात एमएस्सी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स या दोन वर्षाच्या कालावधीत आपण इलेक्ट्रॉनिक्स थेअरी सोबतच प्रॅक्टिकल ज्ञान जे काही शिकलो, तोच आपल्या प्रगतीचा पाया आहे. जेईएसमधील भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रात त्या काळापासून सर्वाधिक प्रगत आहे. तत्कालीन विभाग प्रमुख प्रा. के. आर. पाटील, प्रा. सुरेश लाहोटी, प्रा. भंडारी यांनी आपल्याला शिकवलेल्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या पायाभूत ज्ञानाच्या आणि व्यक्तिगत पातळीवर केलेल्या मदतीने आणि मार्गदर्शनातूनच आपले व्यक्तिमत्त्व घडल्याचे डॉ शुक्ला यांनी सांगितले.इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-यांना खूपच उज्ज्वल भवितव्य आहे. कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आले पाहिजे, त्यांना खूप मोठा वाव मिळेल. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात व्यवसाय उभा करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मोठी रक्कम अनुदान स्वरूपात कंप्युटर आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी दिली जाते, असे शुक्ला म्हणाले.इयत्ता ८ ते इयत्ता १० या वर्गातील ५० ते ६० टक्के जागा मिळवणाºया विद्यार्थ्यांना करिअरच्या दिशेची पायाभरणी आणि संपूर्ण मार्गदर्शन करणार असल्याचे शिक्षण सहसंचालक महेश शिवणकर यांनी सांगितले.माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या प्रगती, रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या वाटा विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी माजी विद्यार्थी संवाद हा विशेष कार्यक्रम सातत्याने चालवत आहोत. त्यामुळे आमच्या वर्तमान विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होतो आहे, असे पुरुषोत्तम बगडिया यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. डी. काबरा यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुशांत देशमुख यांनी केले. प्रा. टी. आर. जगताप यांनी आभार मानले.