शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष; प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:48 IST

कमी मतदान झाल्याचा फटका कोणाला बसतो हे गुरूवारी पुढे येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील जालना वगळता अन्य चार मतदारसंघांत मतदारांनी पावसाची तमा न बाळगता भरभरून मतदान केले. जालन्यात गेल्यावेळपेक्षा चार टक्क्यांनी मतदान कमी झाले. जालन्यातील शहरी मतदारांनी मतदान न करणेच पंसद केले आहे. या कमी मतदान झाल्याचा फटका कोणाला बसतो हे गुरूवारी पुढे येणार आहे.निवडणूक विभागासह अन्य राजकीय पक्षांनी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून विशेष प्रयत्न केले होते. संकल्पपत्र भरून घेण्यासह पथनाट्य आणि अन्य उपक्रमांतून जागृती केली होती. असे असतांनाही जालन्या सारख्या शहरात मतदारांचा निरूत्साह दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जालना वगळता परतूर, घनसावंगी तसेच बदनापूर आणि भोकरदन या विधानसभा मतदारसंघात मात्र, मतदारांनी घराबाहेर पडून आपला हक्क बजावाला.वॉच टॉवरसह सीसीटीव्हीची नजरजालन्यात मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वॉच टावरसह सीसीटीव्हीच्या नजरेत ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी तीन प्रकारचे कवच तयार करण्यात आले आहे. पहिल्या कवचमध्ये केंद्रीय पोलीस दलाचे २५ कर्मचारी, दुसऱ्या कवचमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे १२ तर तिसºया कवचमध्ये राज्य पोलीसचे १२ कर्मचारी आहेत.परतुरात तयारीपरतूर : परतूर येथे ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी चार वॉच टॉवर उभारण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दल व राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक तुकडी येथे पाहारा देत आहे. या मतदारसंघात ३२५ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. सर्व ईव्हीएम मशीन परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक व पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी २ पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उपनिरीक्षक, सीमा सुरक्षा दलाची एक व राज्य राखीव दलाची एक अशा दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच २४ पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी खास चार वॉच टॉवर तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोपान बांगर, गोपनीय शाखेचे प्रल्हाद गुंजकर यांनी दिली.घनसावंगीत जवानांसह शंभर पोलीस कर्मचारीघनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ३३९ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. घनसावंगी मतदार संघात सवार्धिक ७३ टक्के मतदान झाले. सर्व केंद्रावरील ईव्हीएम मशीन घनसावंगी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ठेवण्यात आल्या आहे. या मशीनच्या सुरक्षेसाठी १ पोनि. आय एस पथक, एक एस आरपीएफची तुकडी व १०० स्थानिक पोलीस कर्मचारी पाहारा देत आहेत.कृषी विद्यालयात तयारीबदनापूर मतदारसंघाची मतमोजणी ही कृषी महाविद्यालयात होणार आहे. यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था केली आहे. सीआरपीएफचे जवान तसेच राज्य पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. या सर्व प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी गणेश नि-हाळी तसेच तहसीलदार छाया पवार या जातिने लक्ष ठेवून ओहत.तयारी : भोकरदन येथे २४ कर्मचा-यांसह जवान तैनातभोकरदन : भोकरदन येथे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, १ अधिकारी व २४ कर्मचा-यासह १ एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी दिली.भोकरदन विधानसभा मतदारसंघातील ३२२ मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान पार पडले. ३ लाख ५ हजार ७०९ मतदारांपैकी २ लाख १५ हजार ७८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, सर्व ईव्हीएम मशीन नगर परिषदेच्या मंगल कार्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliceपोलिस