शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

भाजपच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

सुखापुरी गावात स्वच्छता मोहीम अंबड : तालुक्यातील सुखापुरी गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पंचायत समिती उपसभापती रईस बागवान, ...

सुखापुरी गावात स्वच्छता मोहीम

अंबड : तालुक्यातील सुखापुरी गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पंचायत समिती उपसभापती रईस बागवान, ग्रामविकास अधिकारी आत्माराम चव्हाण, कैलास कल्याणकर, डॉ. विलास भोजने, भगवान राखुंडे, जाकेर बागवान, अशोक राक्षे, नसीर बागवान, भगवान शिंदे, दत्तू फाटक, गजानन शिंदे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

खंडित वीजपुरवठा; शेतकऱ्यांची गैरसोय

अंबड : महावितरणकडून शेतीला होणारा वीजपुरवठा खंडित स्वरूपाचा होत आहे. रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांना तासनतास विजेची वाट पाहत थांबावे लागत आहे. त्यात हिंस्र प्राण्यांची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. ही बाब पाहता शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.

शेलगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सपोउपनि पिंपळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मदन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एल.टी. मदन, मुख्याध्यापक अरविंद खरात, सुरज जाधव, अनिल कदम, जगन घुगे, परमेश्वर गवंगे, ऋषिकेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

सेवानिवृत्तीनिमित्त डिघे यांचा सत्कार

बदनापूर : सैन्यदलातील १७ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले चितोड येथील किशोर दौलतराव डिघे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बंडू सुरडकर, सुभाष डिघे, प्रवीण श्यामल, शुभम शिंदे, शिवराज सिरसाट, पवन डिघे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी

भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दारूमुळे तळीरामांची संख्या वाढत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. महिलांनाही तळीरामांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

अंबेकरांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

जालना : शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी मानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्याध्यापक संदीप कुलकर्णी, अशोक हांडे, एकनाथ हांडे, बबन पोहेकर, विठ्ठल पडूळ, राम गायकवाड, बाबुराव पवार, बाला परदेशी, सरपंच पद्माकर हांडे, रामा जाधव यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.

शहरांतर्गत बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी

जाफराबाद : शहरांतर्गत भागातील अनेक पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय, चोरटेही अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या करीत आहेत. ही बाब पाहता बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरीवर्ग चिंतित

जालना : गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा रब्बीतील पिके चांगली आहेत. परंतु, गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव निर्माण होत आहे. शेतकरी महागडी औषधे फवारणी करून रोगराई कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, वाढलेल्या रोगराईमुळे यंदा रब्बीतील उत्पादनावरही घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.