शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

कामचुकार अधिकाऱ्यांवरुन गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:00 IST

जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या फायली पुढच्या टेबलावर जात नाहीत, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या फायली पुढच्या टेबलावर जात नाहीत, अशा कामकुचार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांची उपस्थिती होती.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पुरात मरण पावलेल्यांना सभागृहाच्यावतीने श्रध्दाजंली वाहण्यात आली. त्यानंतर सदस्य जयमंगल जाधव यांनी जि.प. कार्यालयातील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्वच शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. पाण्याची टाकी गेल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेली नाही. तेच पाणी आपण सर्वजण पित आहोत. साफ-सफाई करण्यासाठी जिल्हा परिषदेने ३० लक्ष रुपये खर्च करुन फॉगिंग मशीन खरेदी केल्या. परंतु, त्या मशीन तशाच पडलेल्या आहेत. त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रशासनाने जि. प. कार्यालयाची साफ-सफाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.कोणतेही काम घेऊन गेले तर कर्मचारी टेबलावर दिसत नाही. सकाळी अकरा वाजता कर्मचारी येऊन सही करतात आणि निघून जातात. त्यांच्याकडे आलेल्या फाईली पुढच्या टेबलावर सरकतच नाहीत. त्यामुळे कामे पेंडींग पडत आहे. याकडे सीईओंनी लक्ष देवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना अध्यक्ष खोतकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच सीईओंनी पथक तयार करुन कर्मचा-यांची पाहणी केली. यात अनेक कर्मचारी गैरहजार आढळून आले, जे गैरहजार होते. त्यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्याचे ते म्हणाले. या सभेला सर्व विभागाचे सभापती, अधिकारी उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत उद्भवलेल्या पूर परिस्थितीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, तेथील सर्वसामान्यांसमोर अनेक प्रश्न उभा आहेत. ही बाब पाहता जालना शहरासह जिल्हाभरातील संस्था, संघटना, शाळकरी मुलांसह सर्वसामान्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. जालना जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने ही पूरग्रस्तांना जवळपास १ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.जिल्ह्यात वनराई बंधारे तयार करणारजिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांतच जिल्हाभरात वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष खोतकर यांनी दिली. यासाठी सर्व ग्रामसेवकांना गावांची पाहणी करण्याचे आदेश दिले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदcivic issueनागरी समस्याPoliticsराजकारणSocialसामाजिक