शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दुष्काळाच्या मुद्यावरून गाजली जि.प. सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:47 IST

दुष्काळाबाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याचा आरोप शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भासत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असून, प्रशासनाच्या वतीने अद्यापही चारा छावण्या सुरु करण्यात आल्या नाही. अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत असताना त्या गावांना फक्त एक टॅकर सुरु करण्यात आले आहे. दुष्काळाबाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याचा आरोप शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, वित अधिकारी चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, सर्व सभापती यांची उपस्थिती होती.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर लगेचच सदस्य शालीकराम म्हस्के यांनी दुष्काळाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मागील तीन ते चार सभेत दुष्काळावर चर्चा करण्यात आली. ज्या गावांना तीव्र पाणीटंचाई आहे. अशा गावांना पाणी पुरवण्याच्या सूचना देखील सभागृहाच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु, जाफराबाद तालुक्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असतांना देखील तेथे एकाच टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यातील अनेक गावांची लोकसंख्या ४ ते ५ हजार आहे. अशा ठिकाणी फक्त एकाच टॅकरने पाणीपुरवठा सुरु असल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. शासन निर्णयानुसार गावातील माणसे व जनावरांच्या संख्येनुसार गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो, परंतु, त्यानुसार पाणी पुरवठा करण्यात येत नाही.विहिरी, बोअर कोरडेठाक पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन मात्र उदासिन दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत संबंधित अधिका-याला विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही गावाचीलोकसंख्या व जनावरांची लोकसंख्या तहसील कार्यालयकडे पाठविली होती. परंतु, त्यांनी जनावरांची संख्या काढा असे सांगून प्रस्ताव परत पाठवला होता. यावरुनच सभागृहात गोंधळ झाला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण अथवा स्थायी सभेत अनेक महत्वाच्या विभागाचे अधिकारी सूचना देऊनही गैरहजर राहतात. त्यांच्याकडून खुलासा मागवून कारवाई करण्यावरही सभागृहात चर्चा झाली.अंबड येथील मत्स्योदरी मंदिरापासून तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे पाणी दूषित असून, यामुळे ज्या गावांना शासकीय टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या गावातील अनेकजण आजारी पडले आहेत. हा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप बाप्पासाहेब गोल्डे यांनी केला आहे. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी म्हणाले की, मला अशी काहीच कल्पना नाही. मी या पाण्याची तपासणी करत असल्याचे ते म्हणाले.युतीमुळे विरोधक झाले थंडराज्यात भाजप व शिवसेनेची युती झाली असल्याने जिल्हा परिषदेच्या विरोधी बाकावर बसलेले भाजपचे सदस्य थंड झाले असल्याचे पाहायला मिळाले. युती झाल्यानंतर ही जिल्हा परिषदेची पहिलीच सभा आहे. येरवी आक्रमक पवित्रा घेणारे भाजपचे सदस्य शनिवारी झालेल्या सभेत थंड पडलेले दिसले.सहा महिन्यांपासून लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेतविशेष निधीतून भोकरदन तालुक्यातील ५ लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले. त्यानंतर त्यांना घरेही पाडण्याचे सांगितले. परंतु, मागील सहा महिन्यापासून त्यांना निधी देण्यात आला नाही. हा निधी त्वरित देण्यात यावा, अशी मागणी सदस्या आशा पांडे यांनी केली आहे.आरोप : दुष्काळाबाबत जिल्हाधिका-यांच्या भूमिकेवर शंकादुष्काळी मुद्यावर चर्चा सुरु असताना सदस्य जयमंगल जाधव हे म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्हाधिका-यांचे याकडे दुर्लक्ष आहे. जिल्हाधिका-यांची भूमिका दुष्काळाबाबत नकारात्मक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी सदस्य, अधिकारी व कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पाणी टंचाईच्या मुद्यावरही सभागृहात जोरदार चर्चा झाली. अनेक गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पाठवूनही ते मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदdroughtदुष्काळwater transportजलवाहतूक