शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

दुष्काळाच्या मुद्यावरून गाजली जि.प. सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:47 IST

दुष्काळाबाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याचा आरोप शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भासत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असून, प्रशासनाच्या वतीने अद्यापही चारा छावण्या सुरु करण्यात आल्या नाही. अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत असताना त्या गावांना फक्त एक टॅकर सुरु करण्यात आले आहे. दुष्काळाबाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याचा आरोप शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, वित अधिकारी चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, सर्व सभापती यांची उपस्थिती होती.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर लगेचच सदस्य शालीकराम म्हस्के यांनी दुष्काळाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मागील तीन ते चार सभेत दुष्काळावर चर्चा करण्यात आली. ज्या गावांना तीव्र पाणीटंचाई आहे. अशा गावांना पाणी पुरवण्याच्या सूचना देखील सभागृहाच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु, जाफराबाद तालुक्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असतांना देखील तेथे एकाच टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यातील अनेक गावांची लोकसंख्या ४ ते ५ हजार आहे. अशा ठिकाणी फक्त एकाच टॅकरने पाणीपुरवठा सुरु असल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. शासन निर्णयानुसार गावातील माणसे व जनावरांच्या संख्येनुसार गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो, परंतु, त्यानुसार पाणी पुरवठा करण्यात येत नाही.विहिरी, बोअर कोरडेठाक पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन मात्र उदासिन दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत संबंधित अधिका-याला विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही गावाचीलोकसंख्या व जनावरांची लोकसंख्या तहसील कार्यालयकडे पाठविली होती. परंतु, त्यांनी जनावरांची संख्या काढा असे सांगून प्रस्ताव परत पाठवला होता. यावरुनच सभागृहात गोंधळ झाला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण अथवा स्थायी सभेत अनेक महत्वाच्या विभागाचे अधिकारी सूचना देऊनही गैरहजर राहतात. त्यांच्याकडून खुलासा मागवून कारवाई करण्यावरही सभागृहात चर्चा झाली.अंबड येथील मत्स्योदरी मंदिरापासून तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे पाणी दूषित असून, यामुळे ज्या गावांना शासकीय टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या गावातील अनेकजण आजारी पडले आहेत. हा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप बाप्पासाहेब गोल्डे यांनी केला आहे. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी म्हणाले की, मला अशी काहीच कल्पना नाही. मी या पाण्याची तपासणी करत असल्याचे ते म्हणाले.युतीमुळे विरोधक झाले थंडराज्यात भाजप व शिवसेनेची युती झाली असल्याने जिल्हा परिषदेच्या विरोधी बाकावर बसलेले भाजपचे सदस्य थंड झाले असल्याचे पाहायला मिळाले. युती झाल्यानंतर ही जिल्हा परिषदेची पहिलीच सभा आहे. येरवी आक्रमक पवित्रा घेणारे भाजपचे सदस्य शनिवारी झालेल्या सभेत थंड पडलेले दिसले.सहा महिन्यांपासून लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेतविशेष निधीतून भोकरदन तालुक्यातील ५ लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले. त्यानंतर त्यांना घरेही पाडण्याचे सांगितले. परंतु, मागील सहा महिन्यापासून त्यांना निधी देण्यात आला नाही. हा निधी त्वरित देण्यात यावा, अशी मागणी सदस्या आशा पांडे यांनी केली आहे.आरोप : दुष्काळाबाबत जिल्हाधिका-यांच्या भूमिकेवर शंकादुष्काळी मुद्यावर चर्चा सुरु असताना सदस्य जयमंगल जाधव हे म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्हाधिका-यांचे याकडे दुर्लक्ष आहे. जिल्हाधिका-यांची भूमिका दुष्काळाबाबत नकारात्मक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी सदस्य, अधिकारी व कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पाणी टंचाईच्या मुद्यावरही सभागृहात जोरदार चर्चा झाली. अनेक गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पाठवूनही ते मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदdroughtदुष्काळwater transportजलवाहतूक