शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दिशा मुंबईची, ध्येय आरक्षणाचे; आता माघार घेणार नसल्याची मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती

By विजय मुंडे  | Updated: December 29, 2023 19:49 IST

आम्ही मुंबई गाठून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

जालना : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. आरक्षणासाठीच आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार असून, आमचे ध्येय आरक्षण आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी येणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

आरक्षणासाठी मराठा समाजाचे शांततेत आंदोलन सुरू आहे. शांततेत असणाऱ्या या आंदोलनाला शासनाने परवानगी द्यावी. परवानगी दिली नाही तरीही आम्ही मुंबईत आंदोलन करणार आहोत. महाराष्ट्रातील घराघरातील मराठे या आंदोलनासाठी येणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. त्यामुळे कपडे, अन्नपदार्थांसह इतर वस्तू नेण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली लागणार आहे. यामुळे शासनाने वाहने अडवू नयेत. वाहने अडविली तरी आम्ही आंदोलन करणार. गुन्हे दाखल झाले तरी जातीसाठी आम्ही गुन्हे अंगावर घेवू, असे जरांगे पाटील म्हणाले.

मुंबईतील मैदान पाहण्यासाठी शिष्टमंडळ गेले आहे. मुंबईतील मराठा समाज बांधव, शिष्टमंडळ जे मैदान ठरवितील तेथे आंदोलन केले जाईल. २० जानेवारी रोजी अंतरवालीतून आम्ही निघणार आहोत. मुंबईकडे पायी जाणार आहोत. त्यामुळे चार दिवस लागतील की जास्त दिवस ते सांगता येणार नाही. ज्येष्ठ मंडळीही पायी चालणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतच आम्ही मुंबई गाठून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

मराठवाड्यात कमी नोंदीकाही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे समितीने मराठवाड्यात, महाराष्ट्रात पुन्हा काम करावे. हैदराबादला जावून कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. आम्हाला मुंबईत जाण्याची हौस नाही. त्यापूर्वीच शासनाने आमच्या मागणीनुसार आरक्षण द्यावे, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना