शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दिशा मुंबईची, ध्येय आरक्षणाचे; आता माघार घेणार नसल्याची मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती

By विजय मुंडे  | Updated: December 29, 2023 19:49 IST

आम्ही मुंबई गाठून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

जालना : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. आरक्षणासाठीच आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार असून, आमचे ध्येय आरक्षण आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी येणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

आरक्षणासाठी मराठा समाजाचे शांततेत आंदोलन सुरू आहे. शांततेत असणाऱ्या या आंदोलनाला शासनाने परवानगी द्यावी. परवानगी दिली नाही तरीही आम्ही मुंबईत आंदोलन करणार आहोत. महाराष्ट्रातील घराघरातील मराठे या आंदोलनासाठी येणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. त्यामुळे कपडे, अन्नपदार्थांसह इतर वस्तू नेण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली लागणार आहे. यामुळे शासनाने वाहने अडवू नयेत. वाहने अडविली तरी आम्ही आंदोलन करणार. गुन्हे दाखल झाले तरी जातीसाठी आम्ही गुन्हे अंगावर घेवू, असे जरांगे पाटील म्हणाले.

मुंबईतील मैदान पाहण्यासाठी शिष्टमंडळ गेले आहे. मुंबईतील मराठा समाज बांधव, शिष्टमंडळ जे मैदान ठरवितील तेथे आंदोलन केले जाईल. २० जानेवारी रोजी अंतरवालीतून आम्ही निघणार आहोत. मुंबईकडे पायी जाणार आहोत. त्यामुळे चार दिवस लागतील की जास्त दिवस ते सांगता येणार नाही. ज्येष्ठ मंडळीही पायी चालणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतच आम्ही मुंबई गाठून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

मराठवाड्यात कमी नोंदीकाही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे समितीने मराठवाड्यात, महाराष्ट्रात पुन्हा काम करावे. हैदराबादला जावून कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. आम्हाला मुंबईत जाण्याची हौस नाही. त्यापूर्वीच शासनाने आमच्या मागणीनुसार आरक्षण द्यावे, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना