शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकरी आक्रमक; अंबड - पाथरी मार्गावर रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 18:33 IST

जिल्ह्यातील १९ मंडळांमधील गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले आहे.

- दिगंबर गुजरकुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ या दोन महसूल मंडळांतील ३३ गावांमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही शासन मदत देत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी कुंभार पिंपळगाव येथे सकाळी अंबड - पाथरी मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात कुंभार पिंपळगाव येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील १९ मंडळांमधील गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले आहे. यात घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ मंडळांचा समावेश आहे. या भागातील गावांमध्येही खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. सततच्या अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना तयार झाली आहे. शासनाने भेदभाव न करता अनुदान द्यावे, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार खैरनार हे येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, एक तास उलटूनही नायब तहसीलदार न आल्याने मंडळ अधिकारी एस. बोटुळे व पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनात रवींद्र तौर, गोविंद आर्दड, रखमाजी सुरासे, पिनू राऊत, कल्याण कंटुले, बन्सी शेळके, सिद्धेश्वर कंटुले, अतुल कंटुले, विलास काळे, गणेश आर्दड, विजय कंटुले, गजानन तौर, सुरेश काजळे, राजू धनवडे, नागनाथ जाधव, पंडित पवार यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त, मग वगळले कसे?अतिवृष्टीचे अनुदान जाहीर करताना २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी जाहीर करण्यात येते. परंतु, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ येथील पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त असताना पावसाची नोंद कशी घेतली, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना