शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:53 IST

जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जागोजागी नष्ट न होणारे पाणीसाठे तयार झाले आहे. यामुळे डेंग्यूच्या डासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. जिल्हाभरात आतापर्यंत ४७ जणांना डेंग्यू असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्यापैकी २५ रूग्ण हे जालना शहरातील आहेत.दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने नदी, नाल्यांना पाणी आले. वातावरण बदल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे शासकीय रूग्णालयांपासून ते खाजगी रूग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती.पावसामुळे जागोजागी नष्ट न होणारे जलसाठे तयार झाले. यामुळे डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भावही वाढला. त्यामुळे जिल्हाभरात डेंग्यूचा फैलाव वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.यात जालना शहरात सर्वाधिक डेंग्यूचे रूग्ण असून, ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी आहे.जालना शहरात २५ तर ग्रामीण भागात २२ जणांना डेंग्यू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.खाजगी रूग्णालयात रूग्ण उपचारासाठी येतात. तेव्हा डेंग्यू असला की, त्याची माहिती खाजगी रुग्णालयांकडून जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला कळविण्यात येते.त्यानंतर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून सदर व्यक्तींचे रक्त, जलनमुने घेतले जातात.हे नमुने औरंगाबाद येथील मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येतात.जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने १४१ जणांचे नमुने मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४७ जणांना डेंग्यू असल्याचे समोर आले.आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळेनासध्या आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत जनजागृती करीत आहेत. तसेच प्रत्येक घरात जाऊन जलसाठे रिकामे करण्याचा प्रयत्नही आरोग्य कर्मचारी करीत आहेत. परंतु, नागरिक आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे.जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ५०० कर्मचारी डेंग्यू संदर्भात जनजागृती करीत आहेत. याबरोबर हे कर्मचारी जलसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडत आहेत. हे मासे डेंग्यूचे डास खाऊन घेतील.काय करावे ?घरातील पाणीसाठे नष्ट करावेतआठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.ताप आल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.नागरिकांनी घरात स्वच्छता बळगावी.झोपताना मच्छर दाणीचा उपयोग करावा.डास चावणार नाही याची काळजी घ्यावी.

टॅग्स :dengueडेंग्यूHealth Tipsहेल्थ टिप्स