शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

जालना जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:53 IST

जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जागोजागी नष्ट न होणारे पाणीसाठे तयार झाले आहे. यामुळे डेंग्यूच्या डासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. जिल्हाभरात आतापर्यंत ४७ जणांना डेंग्यू असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्यापैकी २५ रूग्ण हे जालना शहरातील आहेत.दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने नदी, नाल्यांना पाणी आले. वातावरण बदल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे शासकीय रूग्णालयांपासून ते खाजगी रूग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती.पावसामुळे जागोजागी नष्ट न होणारे जलसाठे तयार झाले. यामुळे डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भावही वाढला. त्यामुळे जिल्हाभरात डेंग्यूचा फैलाव वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.यात जालना शहरात सर्वाधिक डेंग्यूचे रूग्ण असून, ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी आहे.जालना शहरात २५ तर ग्रामीण भागात २२ जणांना डेंग्यू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.खाजगी रूग्णालयात रूग्ण उपचारासाठी येतात. तेव्हा डेंग्यू असला की, त्याची माहिती खाजगी रुग्णालयांकडून जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला कळविण्यात येते.त्यानंतर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून सदर व्यक्तींचे रक्त, जलनमुने घेतले जातात.हे नमुने औरंगाबाद येथील मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येतात.जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने १४१ जणांचे नमुने मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४७ जणांना डेंग्यू असल्याचे समोर आले.आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळेनासध्या आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत जनजागृती करीत आहेत. तसेच प्रत्येक घरात जाऊन जलसाठे रिकामे करण्याचा प्रयत्नही आरोग्य कर्मचारी करीत आहेत. परंतु, नागरिक आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे.जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ५०० कर्मचारी डेंग्यू संदर्भात जनजागृती करीत आहेत. याबरोबर हे कर्मचारी जलसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडत आहेत. हे मासे डेंग्यूचे डास खाऊन घेतील.काय करावे ?घरातील पाणीसाठे नष्ट करावेतआठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.ताप आल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.नागरिकांनी घरात स्वच्छता बळगावी.झोपताना मच्छर दाणीचा उपयोग करावा.डास चावणार नाही याची काळजी घ्यावी.

टॅग्स :dengueडेंग्यूHealth Tipsहेल्थ टिप्स