शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात प्रवेशबंदी झुगारून ट्रक सुसाट; दुचाकीवरील मायलेकास उडवले, आईचा जागीच मृत्यू

By विजय मुंडे  | Updated: February 17, 2023 14:09 IST

प्रशासकीय अनास्थेचा जालन्यात बळी; महिलेचा मृत्यू, सुदैवाने वाचले युवकाचे प्राण

जालना : ट्रकने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सुदैवाने अपघातातून बचावला. ही घटना शुक्रवारी सकाळी शहरातील लक्कडकोट भागात घडली. विशेष म्हणजे दिवसा असलेल्या प्रवेशबंदीला झुगारून अनेक मालवाहू वाहने शहरात येत आहेत. प्रशासकीय पातळीवरून अशा वाहनांवर धडक कारवाई करण्याबाबत अनास्था दाखविल्याने त्या महिलेचा बळी गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.

उषा योगानंद पवार (६७ रा. औरंगाबाद) असे मयत महिलेचे नाव आहे. आनंद पवार व त्यांची आई उषा पवार हे दोघे जालना येथील नातेवाईकांच्या घरी असलेल्या कार्यक्रमासाठी आले होते. ते दोघे शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२१- बी.ई.३९४२) जुना जालना भागातील नातेवाईकांच्या घराकडे जात होते. लक्कडकोट भागात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या ट्रकने (क्र.एम.एच.२१- एक्स. ५२२०) जोराची धडक दिली. 

या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या उषा पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद पवार हे जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढून पोलीस ठाणे गाठले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत संताप व्यक्त करीत पोलीस प्रशासन कारवाई करीत नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मयत महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघात