शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात प्रवेशबंदी झुगारून ट्रक सुसाट; दुचाकीवरील मायलेकास उडवले, आईचा जागीच मृत्यू

By विजय मुंडे  | Updated: February 17, 2023 14:09 IST

प्रशासकीय अनास्थेचा जालन्यात बळी; महिलेचा मृत्यू, सुदैवाने वाचले युवकाचे प्राण

जालना : ट्रकने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सुदैवाने अपघातातून बचावला. ही घटना शुक्रवारी सकाळी शहरातील लक्कडकोट भागात घडली. विशेष म्हणजे दिवसा असलेल्या प्रवेशबंदीला झुगारून अनेक मालवाहू वाहने शहरात येत आहेत. प्रशासकीय पातळीवरून अशा वाहनांवर धडक कारवाई करण्याबाबत अनास्था दाखविल्याने त्या महिलेचा बळी गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.

उषा योगानंद पवार (६७ रा. औरंगाबाद) असे मयत महिलेचे नाव आहे. आनंद पवार व त्यांची आई उषा पवार हे दोघे जालना येथील नातेवाईकांच्या घरी असलेल्या कार्यक्रमासाठी आले होते. ते दोघे शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२१- बी.ई.३९४२) जुना जालना भागातील नातेवाईकांच्या घराकडे जात होते. लक्कडकोट भागात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या ट्रकने (क्र.एम.एच.२१- एक्स. ५२२०) जोराची धडक दिली. 

या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या उषा पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद पवार हे जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढून पोलीस ठाणे गाठले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत संताप व्यक्त करीत पोलीस प्रशासन कारवाई करीत नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मयत महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघात