शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दीपक गिंद्रा, अमर भट..दौडनाही जीवन का नाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:47 IST

जालना ते मुंबई हे अंतर धावत पूर्ण केल्याने एक प्रकारे जी संकल्पपूर्ती केली होती. ती शनिवारी हा संकल्प अथक प्रयत्नातून आणि तेवढ्याच उत्साहाने प्रसिध्द धावपटू दिपक गिंद्रा आणि अमर भट या रायझर ग्रुपच्या दोन सदस्यांनी पूर्ण केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना ते मुंबई हे अंतर धावत पूर्ण केल्याने एक प्रकारे जी संकल्पपूर्ती केली होती. ती शनिवारी हा संकल्प अथक प्रयत्नातून आणि तेवढ्याच उत्साहाने प्रसिध्द धावपटू दिपक गिंद्रा आणि अमर भट या रायझर ग्रुपच्या दोन सदस्यांनी पूर्ण केला. ज्यावेळी हे दोघे धावपटू जालन्यात पोहचले त्यावेळी त्यांचे ढोलताशांच्या गरजरात स्वागत करण्यात आले. दररोज ८० ते किलोमीटर धावत हे अंतर पार केल्या नंतरही त्या दोघांच्या चेहऱ्यावर कुठलीच ठकावट दिसून आली नाही.येथील कालिका स्टीलच्या वतीने मुंबई ते जालना हे अंतर दिपक गिंद्रा आणि अमर भट यांना पार करण्यासाठी स्वतंत्र १० दहा जणांचे पथक त्यांच्या सोतबत दिले होते. त्यावेळी त्या पथकातील सदस्यांनी देखील जी मदत केली, ती आम्ही विसरू शकत नसल्याचे गिंद्रा आणि भट यांनी सत्काकराच्यावेळी सांगितले. प्रारंभी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उद्योजक किशोर अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते धावपटूंचा गौरव करण्यात आला. गोरंट्याल यांनी सांगिले की, मुंबई ते जालना हे अंतर या दोघांनी कापून एक मोठा इतिहास रचला आहे. यावेळी खोतकर यांनी सांगितले की, धावणे हे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. त्यामुळे फनरनर्स ग्रुप आणि कालिका स्टीलने जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे नमूद केले.ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करण्यासाठी यावेळी फिजीओथेरपी तज्ज्ञ डॉ. भाविक गाडीया यांची मोलाची साथ मिळाल्याचे आवर्जुन सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू रूप बेताला यांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाल्याचे धावपटूंनी सांगितले. कालिका स्टीचे संचालक अनिल गोयल, अरूण अग्रवाल, सुनील गोयल, जयभगवान जिंदल, अनुप अग्रवाल यांची उपस्थिती होती. कालिका स्टीलच्या ज्या पथकाने मुंबई ते जालना या दरम्यान दोन धावपटूंना मदत केली, त्यांचाही यावेळी स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.मधुमेहावर केली मातपूर्वी धावण्याचा आपला काही संबंध नव्हता. परंतु रायझर ग्रुपच्या संपर्कात आल्यावर धावण्याची आवड निर्माण झाली. मधुमेह असताना आपण धावू शकू असा विचारही मनात नव्हता. मात्र नंतर हिंमत करून सर्वांच्या प्रोत्साहानामुळे आपण थेट मुंबई ते जालना हे अंतर कापल्याचे आता सांगूनही खरे वाटत नसल्याची प्रतिक्रिया अमर भट यांनी व्यक्त केली.दीड तास झोप घेत होतोमुंबई ते जालना हे अंतर कापतांना मनात विश्वास होता. परंतु सर्वांचे प्रोत्साहन आणि कालिका स्टीलच्या सोबत असलेल्या दहा जणांच्या टीममधून जी मदत झाली त्यामुळेही शक्य झाले. दररोज साधारपणे ८० किलोमीटर धावल्यानंतर केवळ दीड तासाची झोप घेत असल्याची प्रतिक्रिया दिपक गिंद्रा यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSocialसामाजिक