शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

केदारखेडा येथे तीव्र पाणी टंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:24 IST

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती : नदी उशाला अन... कोरड घशाला, टँकरचे प्रस्ताव पडून

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. टँकरचे प्रस्ताव प्रशासनाला पाठवूनही त्यावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने ग्रामस्थांत संताप आहे. नदी उशाला अन... कोरड घशाला असा प्रकार झाला आहे.परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परिसरातील पुर्णा नदी ओसंडून वाहली नाही. नदी परिसरत असलेल्या शासकीय विहीरीरवुन गावाला पाणी पुरवठा होतो, मात्र हिवाळ्यातच विहिरीने तळ गाठला आहे. यामुळे गावातील नळाला चार महिन्यापासून पाणी आले नाही. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे.यामुळे पाण्याविना ग्रामस्थांचे हाल सुरुआहे. ग्रामपंचायत टँकरने पाणीपुरवठा करावा असा प्रस्ताव प्रशासना पाठविला आहे. मात्र त्याचा पाठपुरावा नसल्याने अद्यापही टँकरचा प्रस्तावाला मंजूरी मिळालेली नाही. तालुक्यातील महत्वाचे गाव म्हणून केदारखेड्याची ओळख आहे. असे असतांना गावात चार महिन्यापासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाण्याविना ग्रामस्थांचे हाल सुरु आहे. विशेष करुन महिलांना पाणी शेंदून आणण्याच वेळ आली आहे. ग्रा.प. प्रशासन टँकरचा प्रस्ताव पाठवून नामानिराळे झालेले आहे, गावाला चार महिण्यांपासून पाणी नसल्याचे त्यांना सोयर सुतक नाही, दिलेला प्रस्तावास मंजुरी का मिळाली नाही. यांची दखल ग्रा.प. कडून घेण्यात आलेली नाही. गुलदस्यात्यात आहे. केदारखेडा गाव तिन ठीकाणी विस्तारीत झालेले आहे. गावाची लोकसंख्या तीन हजारापेंक्षा जास्त आहे.गावाला पुर्णा नदी पात्रात असलेल्या विहिरीवरुन पाणी पुरवठा होतो. ग्रा.पं. दुर्लक्षामुळे विहिरीमध्ये मोठा गाळ साचला आहे. परिणामी विहिरीने आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठला आहे. आहे. विहिरीच्या कामाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. या गावाला बानेगाव मध्यम प्रकल्पातून कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची नितांत गरज आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. उन्हाळ्याचे तीन महिने अजून जायचे आहे. या उन्हाळ्यात पाण्याविना हाल होण्याची चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater scarcityपाणी टंचाई