शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

पैसेवारी जाहीर; जिल्ह्यात ९७२ गावांत ओला दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST

जालना : खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावरून पंचनामे करण्यात आले होते. आता ...

जालना : खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावरून पंचनामे करण्यात आले होते. आता गावांची पैसेवारी शासन स्तरावरून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच ९७२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे.

मागील काही वर्षांत गतवर्षी जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यामान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेली खरीप पिके वाया गेली होती. विशेष म्हणजे नदीकाठच्या शेतांमधील तर मातीही वाहून गेली होती. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यात अतिवृष्टी व पुरामळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ५ लाख ५३ हजार ७६७ शेतकरी शासन मदतीस पात्र ठरले आहेत. या सर्वच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात सहा लाख ४२ हजार ६०४ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती; परंतु सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, कापूस सोयाबीन इत्यादी पिकांचे चार लाख ९३ हजार हेक्टरवर नुकसान झाले होते. आता शासन स्तरावरून जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. जिल्ह्यातील इतर ९७१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.

मदतीचा लाभ

ज्या गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत कमी आहे, त्या गावांमधील शेतकऱ्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत देण्यात येत आहे. आजवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे.