शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

महामार्ग नव्हे मृत्यूचे सापळे ! राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर मागील दहा महिन्यांत १२१ अपघातात ७२ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 15:43 IST

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे.

ठळक मुद्दे या अपघातात ११२ जण गंभीर जखमीखड्डे ठरतायत धोकादायक

जालना : कोरोनामुळे खाजगी आणि शासकीय प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक जण खाजगी वाहनांचा वापर करीत प्रवास करीत असून, रस्ता अपघातात वाढ होत आहे. चालू वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गावर १२१ अपघात झाले आहेत. त्यात ७२ जणांचा बळी गेला असून, ११२ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर बंदी आणण्यात आली होती. कोरोनापूर्वी जानेवारीत जिल्ह्यातील महामार्गावर १७ अपघात झाले आहेत. १२ जणांचा बळी गेला असून, १९ जण गंभीर जखमी झाले. फेब्रुवारी महिन्यातही १७ अपघात झाले. या अपघातांमध्ये १२ जणांचा बळी गेला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले; परंतु राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील अपघाताचे सत्र कायम राहिले.

मार्च महिन्यात १३ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर २३ जण गंभीर जखमी झाले. एप्रिल महिन्यात झालेल्या तीन अपघातांत तिघांचा बळी गेला आहे. मे महिन्यात १० अपघात झाले आहेत. या अपघातांत पाच जणांचा बळी गेला आहे, तर १३ जण गंभीर जखमी झाले. जून महिन्यात ११ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुलै महिन्यात १४ अपघात झाले असून, त्यात नऊ जणांचा बळी गेला आहे, तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ११ अपघात झाले असून, त्यात सात जणांचा बळी गेला आहे, तर सात जण गंभीर जखमी झाले.

सप्टेंबर महिन्यातही ११ अपघात झाले. यात पाच जणांचा बळी गेला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत, तर ऑक्टोबर महिन्यात १४ अपघात झाले आहेत. यात सात जणांचा बळी गेला असून, १० जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूणच कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी महामार्गाची दुरवस्था आणि चालकांकडून वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. 

खड्डे ठरतायत धोकादायकजिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत, तर ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत तीही संथगतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी साईड पंखे नसल्यानेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविण्याची गरज आहे.

नियमांचे पालन महत्त्वाचेरस्ता अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वेळोवेळी वाहनचालकांच्या बैठका घेऊन, कार्यक्रमांमध्येही समुपदेशन केले जाते. कारवाया करतानाही चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. अपघाताचे सत्र कमी करण्यासाठी चालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. -पोउपनि. हरेश्वर घुगे, महामार्ग पोलीस, जालना

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना