शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग नव्हे मृत्यूचे सापळे ! राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर मागील दहा महिन्यांत १२१ अपघातात ७२ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 15:43 IST

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे.

ठळक मुद्दे या अपघातात ११२ जण गंभीर जखमीखड्डे ठरतायत धोकादायक

जालना : कोरोनामुळे खाजगी आणि शासकीय प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक जण खाजगी वाहनांचा वापर करीत प्रवास करीत असून, रस्ता अपघातात वाढ होत आहे. चालू वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गावर १२१ अपघात झाले आहेत. त्यात ७२ जणांचा बळी गेला असून, ११२ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर बंदी आणण्यात आली होती. कोरोनापूर्वी जानेवारीत जिल्ह्यातील महामार्गावर १७ अपघात झाले आहेत. १२ जणांचा बळी गेला असून, १९ जण गंभीर जखमी झाले. फेब्रुवारी महिन्यातही १७ अपघात झाले. या अपघातांमध्ये १२ जणांचा बळी गेला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले; परंतु राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील अपघाताचे सत्र कायम राहिले.

मार्च महिन्यात १३ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर २३ जण गंभीर जखमी झाले. एप्रिल महिन्यात झालेल्या तीन अपघातांत तिघांचा बळी गेला आहे. मे महिन्यात १० अपघात झाले आहेत. या अपघातांत पाच जणांचा बळी गेला आहे, तर १३ जण गंभीर जखमी झाले. जून महिन्यात ११ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुलै महिन्यात १४ अपघात झाले असून, त्यात नऊ जणांचा बळी गेला आहे, तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ११ अपघात झाले असून, त्यात सात जणांचा बळी गेला आहे, तर सात जण गंभीर जखमी झाले.

सप्टेंबर महिन्यातही ११ अपघात झाले. यात पाच जणांचा बळी गेला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत, तर ऑक्टोबर महिन्यात १४ अपघात झाले आहेत. यात सात जणांचा बळी गेला असून, १० जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूणच कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी महामार्गाची दुरवस्था आणि चालकांकडून वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. 

खड्डे ठरतायत धोकादायकजिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत, तर ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत तीही संथगतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी साईड पंखे नसल्यानेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविण्याची गरज आहे.

नियमांचे पालन महत्त्वाचेरस्ता अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वेळोवेळी वाहनचालकांच्या बैठका घेऊन, कार्यक्रमांमध्येही समुपदेशन केले जाते. कारवाया करतानाही चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. अपघाताचे सत्र कमी करण्यासाठी चालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. -पोउपनि. हरेश्वर घुगे, महामार्ग पोलीस, जालना

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना