शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

महामार्ग नव्हे मृत्यूचे सापळे ! राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर मागील दहा महिन्यांत १२१ अपघातात ७२ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 15:43 IST

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे.

ठळक मुद्दे या अपघातात ११२ जण गंभीर जखमीखड्डे ठरतायत धोकादायक

जालना : कोरोनामुळे खाजगी आणि शासकीय प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक जण खाजगी वाहनांचा वापर करीत प्रवास करीत असून, रस्ता अपघातात वाढ होत आहे. चालू वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गावर १२१ अपघात झाले आहेत. त्यात ७२ जणांचा बळी गेला असून, ११२ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर बंदी आणण्यात आली होती. कोरोनापूर्वी जानेवारीत जिल्ह्यातील महामार्गावर १७ अपघात झाले आहेत. १२ जणांचा बळी गेला असून, १९ जण गंभीर जखमी झाले. फेब्रुवारी महिन्यातही १७ अपघात झाले. या अपघातांमध्ये १२ जणांचा बळी गेला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले; परंतु राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील अपघाताचे सत्र कायम राहिले.

मार्च महिन्यात १३ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर २३ जण गंभीर जखमी झाले. एप्रिल महिन्यात झालेल्या तीन अपघातांत तिघांचा बळी गेला आहे. मे महिन्यात १० अपघात झाले आहेत. या अपघातांत पाच जणांचा बळी गेला आहे, तर १३ जण गंभीर जखमी झाले. जून महिन्यात ११ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुलै महिन्यात १४ अपघात झाले असून, त्यात नऊ जणांचा बळी गेला आहे, तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ११ अपघात झाले असून, त्यात सात जणांचा बळी गेला आहे, तर सात जण गंभीर जखमी झाले.

सप्टेंबर महिन्यातही ११ अपघात झाले. यात पाच जणांचा बळी गेला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत, तर ऑक्टोबर महिन्यात १४ अपघात झाले आहेत. यात सात जणांचा बळी गेला असून, १० जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूणच कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी महामार्गाची दुरवस्था आणि चालकांकडून वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. 

खड्डे ठरतायत धोकादायकजिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत, तर ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत तीही संथगतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी साईड पंखे नसल्यानेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविण्याची गरज आहे.

नियमांचे पालन महत्त्वाचेरस्ता अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वेळोवेळी वाहनचालकांच्या बैठका घेऊन, कार्यक्रमांमध्येही समुपदेशन केले जाते. कारवाया करतानाही चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. अपघाताचे सत्र कमी करण्यासाठी चालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. -पोउपनि. हरेश्वर घुगे, महामार्ग पोलीस, जालना

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना