शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विषबाधा झाल्याने ४२ मेंढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 01:11 IST

गवतातून विषबाधा झाल्याने सिपोरा बाजार येथील मेंढपाळाच्या ४२ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिपोरा बाजार : गवतातून विषबाधा झाल्याने सिपोरा बाजार येथील मेंढपाळाच्या ४२ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील माणिक लक्ष्मण सोरमारे, कैलास पिराजी काळे यांनी नेहमीप्रमाणे रविवारीही आपल्या मेंढरांना रानात चारण्यासाठी नेले. दिवसभर मेंढ्या चारून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी आणत असताना अचानक एकेक मेंढी मरून पडत असल्याचे निदर्शनास आले. या मेंढ्यांना बोरगाव जहा. येथील गट नं. २८३ मधील आनंदा सीताराम सोरमारे यांच्या शेतात अखर बसविण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून परतत असताना हा प्रकार घडला. या शेतात चरत असतानाच मेंढ्यांना विषबाधा झाली. त्यामुळे वरील प्रकार घडला. या विषबाधेची लागण कळपातील जवळपास १००हून अधिक मेंढ्यांना झाली आहे. आतापर्यत ४२ मेंढ्या दगावल्या असून आणखी काही धोक्यात आहेत. या प्रकरणी नायब तहसीलदार काशीनाथ तांगडे व तलाठी आर.ए. जायभाये यांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यू