शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकसहभागातून साडेचार लाख रुपये गोळा करून दुरुस्त केला बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:47 IST

पाणी वाहून गेल्याने जैनपूर कठोरा येथील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता ४ लाख ५० हजार रूपये जमा करून या फुटलेल्या बंधा-यामध्ये माती व मुरूमाचा भराव भरून पाणी अडविले आहे.

फकिरा देशमुुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील पूर्णा नदीला परतीच्या पावसामुळे आलेल्या महापुरात १२ बंधारे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. पाणी वाहून गेल्याने जैनपूर कठोरा येथील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता लोकसभागातून ४ लाख ५० हजार रूपये जमा करून या फुटलेल्या बंधा-यामध्ये माती व मुरूमाचा भराव भरून पाणी अडविले आहे. या पाण्याचा परिसरातील २०० हेक्टर सिंचनाला फायदा होणार आहे़आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर आला होता. या पुरामुळे पूर्णा, जुई, गिरजा, रायघोळ, धामणा या नद्यांवरील १२ ते १५ कोल्हापुरी बंधारे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. बंधाºयातील पाणी वाहून गेल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. बंधारे फुटल्यानंतर मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने पंचनामे करून दुरूस्तीसाठीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला.मात्र, त्याला मंजुरी कधी मिळेल व काम कधी होणार याची वाट न बघता जैनपूर - कठोरा येथील सोनाजी दांडगे, हरिदास कोठाळे, बंडू पाटील, रामकिसन कोठाळे, बाबूराव सोनोने, बिसन जाधव, आप्पा कोठाळे, रामदास रोडे, विठ्ठल रोडे, सुधाकर रोडे, रत्नाकर रोडे यांनी या बंधा-याचा लाभ मिळणा-या सर्व शेतकऱ्यांची बैठक घेतली.बैठकीत प्रत्येक शेतक-याने ३ हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा निर्णय घेतला. सर्व शेतकºयांनी दिलेल्या वर्गणीतून ४ लाख रुपये जमा झाले. पोकलँन, जेसीबी व तीन टिप्परच्या माध्यामातून फुटलेल्या बंधा-याच्या वाहून गेलेल्या भागात माती व मुरूमाचा भराव टाकला. त्याला आतल्या बाजूने प्लॅस्टिकची पन्नी लावण्यात आली.पाणी व माती वाहून जाणार नाही याची देखील काळजी घेण्यात आली. यामुळे ७९३ सघमी. पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SocialसामाजिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी