शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

दादा-भाऊ तुमचं जमलं.. दुष्काळाने आमचं विस्कटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:12 IST

गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते. त्यांच्यातील रूसवे, फुगवे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे सर्वसामान्यांनी देखील याकडे लक्ष दिले नाही. परंतु यात दानवेंचा लक्ष्यभेद करण्यासाठी अर्जुनाने धनुष्यबाण उचलून प्रत्यंचा ताणली देखील होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या वादात श्रीकृष्णाची भूमिका निभावून आधुनिक महाभारताच्या रणांगणावरून अर्जुनाला अखेर माघार घ्यायला भाग पाडले.या सर्व प्रकरणात दोन महिने वाऱ्या सारखे निघून गेले. परंतु याचवेळी दुष्काळाने होरपळणाºया शेतकऱ्यांकडे पाहण्यास कोणालाच वेळ नव्हता. परंतु आता, दादा-भाऊ तुमचे तर पुन्हा गळ्यात गळे पडले असून आता आमच्याकडेही पाहावे, अशी आर्त हाक शेतक-यांमधून ऐकू येत आहे.जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. गेले दोन महिने केवळ दानवे आणि खोतकर यांच्यातील कुरबुरीतच गेले. त्यातही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बैठका घेऊन अधिका-यांना सूचना दिल्या. परंतु त्याकडेही प्रशासनाने चलता है...धोरण स्वीकारले. फेब्रुवारीत आलेल्या आठ चारा छावण्यांच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्यात प्रशासाने धन्यता मानली. इकडे चा-याचे भाव गगनाला भिडले असून, माणसांना देखील पाणी मिळणे दुरापास्त झाले असून, जनावरांसाठी कुठून आणावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आठवडी बाजारात गुरांना मिळेल ती किंमत देऊन जबाबदारीतून पशुपालक मोकळे होत आहेत.अशाही स्थितीत शेतक-यांच्या गंभीर प्रश्नांकडे ना सत्ताधा-यांनी ना लक्ष दिले ना विरोधकांनी. अपवाद केवळ शिवसेनेचा म्हणता येईल. या पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी जवळपास ४० पेक्षा अधिक गावांना भेटी दिल्या. तसेच त्यांचा अहवाल हा पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. मात्र, त्यातून फार काही हाती लागले नाही. आज जिल्ह्यातील पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. ३०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. ही टँकरची संख्या जून अखेरपर्यंत ६०० पेक्षा अधिक होण्याचे संकेत आजच्या परिस्थितीवरून वाटत आहे. एकूणच काय तर आधी बळीराजाच्या नावाने चांगभलं करताना हे राजकारणी आता मतदार राजाच्या नावाने चांगभलं करताना दिसून येत आहेत. आता आठवड्यानंतर लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सोबत प्रचाराचीही रणधुमाळी सुरू होईल. त्यात पुन्हा आचारसंहितेचा बागुलबुवा. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांकडे पाहण्यास ना राजकीय पक्षांना वेळ मिळणार ना प्रशासकीय अधिका-यांना. त्यामुळे यंदाच्या दुष्काळात भरडून जाणे एवढेच ते काय शेतक-यांच्या नशिबात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :HoliहोळीArjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे