शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दादा-भाऊ तुमचं जमलं.. दुष्काळाने आमचं विस्कटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:12 IST

गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते. त्यांच्यातील रूसवे, फुगवे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे सर्वसामान्यांनी देखील याकडे लक्ष दिले नाही. परंतु यात दानवेंचा लक्ष्यभेद करण्यासाठी अर्जुनाने धनुष्यबाण उचलून प्रत्यंचा ताणली देखील होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या वादात श्रीकृष्णाची भूमिका निभावून आधुनिक महाभारताच्या रणांगणावरून अर्जुनाला अखेर माघार घ्यायला भाग पाडले.या सर्व प्रकरणात दोन महिने वाऱ्या सारखे निघून गेले. परंतु याचवेळी दुष्काळाने होरपळणाºया शेतकऱ्यांकडे पाहण्यास कोणालाच वेळ नव्हता. परंतु आता, दादा-भाऊ तुमचे तर पुन्हा गळ्यात गळे पडले असून आता आमच्याकडेही पाहावे, अशी आर्त हाक शेतक-यांमधून ऐकू येत आहे.जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. गेले दोन महिने केवळ दानवे आणि खोतकर यांच्यातील कुरबुरीतच गेले. त्यातही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बैठका घेऊन अधिका-यांना सूचना दिल्या. परंतु त्याकडेही प्रशासनाने चलता है...धोरण स्वीकारले. फेब्रुवारीत आलेल्या आठ चारा छावण्यांच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्यात प्रशासाने धन्यता मानली. इकडे चा-याचे भाव गगनाला भिडले असून, माणसांना देखील पाणी मिळणे दुरापास्त झाले असून, जनावरांसाठी कुठून आणावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आठवडी बाजारात गुरांना मिळेल ती किंमत देऊन जबाबदारीतून पशुपालक मोकळे होत आहेत.अशाही स्थितीत शेतक-यांच्या गंभीर प्रश्नांकडे ना सत्ताधा-यांनी ना लक्ष दिले ना विरोधकांनी. अपवाद केवळ शिवसेनेचा म्हणता येईल. या पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी जवळपास ४० पेक्षा अधिक गावांना भेटी दिल्या. तसेच त्यांचा अहवाल हा पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. मात्र, त्यातून फार काही हाती लागले नाही. आज जिल्ह्यातील पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. ३०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. ही टँकरची संख्या जून अखेरपर्यंत ६०० पेक्षा अधिक होण्याचे संकेत आजच्या परिस्थितीवरून वाटत आहे. एकूणच काय तर आधी बळीराजाच्या नावाने चांगभलं करताना हे राजकारणी आता मतदार राजाच्या नावाने चांगभलं करताना दिसून येत आहेत. आता आठवड्यानंतर लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सोबत प्रचाराचीही रणधुमाळी सुरू होईल. त्यात पुन्हा आचारसंहितेचा बागुलबुवा. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांकडे पाहण्यास ना राजकीय पक्षांना वेळ मिळणार ना प्रशासकीय अधिका-यांना. त्यामुळे यंदाच्या दुष्काळात भरडून जाणे एवढेच ते काय शेतक-यांच्या नशिबात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :HoliहोळीArjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे