शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दादा-भाऊ तुमचं जमलं.. दुष्काळाने आमचं विस्कटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:12 IST

गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते. त्यांच्यातील रूसवे, फुगवे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे सर्वसामान्यांनी देखील याकडे लक्ष दिले नाही. परंतु यात दानवेंचा लक्ष्यभेद करण्यासाठी अर्जुनाने धनुष्यबाण उचलून प्रत्यंचा ताणली देखील होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या वादात श्रीकृष्णाची भूमिका निभावून आधुनिक महाभारताच्या रणांगणावरून अर्जुनाला अखेर माघार घ्यायला भाग पाडले.या सर्व प्रकरणात दोन महिने वाऱ्या सारखे निघून गेले. परंतु याचवेळी दुष्काळाने होरपळणाºया शेतकऱ्यांकडे पाहण्यास कोणालाच वेळ नव्हता. परंतु आता, दादा-भाऊ तुमचे तर पुन्हा गळ्यात गळे पडले असून आता आमच्याकडेही पाहावे, अशी आर्त हाक शेतक-यांमधून ऐकू येत आहे.जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. गेले दोन महिने केवळ दानवे आणि खोतकर यांच्यातील कुरबुरीतच गेले. त्यातही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बैठका घेऊन अधिका-यांना सूचना दिल्या. परंतु त्याकडेही प्रशासनाने चलता है...धोरण स्वीकारले. फेब्रुवारीत आलेल्या आठ चारा छावण्यांच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्यात प्रशासाने धन्यता मानली. इकडे चा-याचे भाव गगनाला भिडले असून, माणसांना देखील पाणी मिळणे दुरापास्त झाले असून, जनावरांसाठी कुठून आणावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आठवडी बाजारात गुरांना मिळेल ती किंमत देऊन जबाबदारीतून पशुपालक मोकळे होत आहेत.अशाही स्थितीत शेतक-यांच्या गंभीर प्रश्नांकडे ना सत्ताधा-यांनी ना लक्ष दिले ना विरोधकांनी. अपवाद केवळ शिवसेनेचा म्हणता येईल. या पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी जवळपास ४० पेक्षा अधिक गावांना भेटी दिल्या. तसेच त्यांचा अहवाल हा पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. मात्र, त्यातून फार काही हाती लागले नाही. आज जिल्ह्यातील पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. ३०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. ही टँकरची संख्या जून अखेरपर्यंत ६०० पेक्षा अधिक होण्याचे संकेत आजच्या परिस्थितीवरून वाटत आहे. एकूणच काय तर आधी बळीराजाच्या नावाने चांगभलं करताना हे राजकारणी आता मतदार राजाच्या नावाने चांगभलं करताना दिसून येत आहेत. आता आठवड्यानंतर लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सोबत प्रचाराचीही रणधुमाळी सुरू होईल. त्यात पुन्हा आचारसंहितेचा बागुलबुवा. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांकडे पाहण्यास ना राजकीय पक्षांना वेळ मिळणार ना प्रशासकीय अधिका-यांना. त्यामुळे यंदाच्या दुष्काळात भरडून जाणे एवढेच ते काय शेतक-यांच्या नशिबात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :HoliहोळीArjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे