शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

६३ हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST

घनसावंगी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे ६३ हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा ९६ हजार ६४० ...

घनसावंगी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे ६३ हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा ९६ हजार ६४० शेतकऱ्यांना फटका बसल्याचा अंदाज आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून तालुक्यातील नुकसानीचे गावनिहाय पंचनामे सुरू आहेत.

तालुक्यात यंदा ८२ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. घनसावंगी मंडळात सर्वाधिक १०६७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ आंतरवाली मंडळात १०४३.४ मिमी, रांजणी मंडळात १०३२.२ मिमी, तीर्थपुरी मंडळात ९६५.१ मिमी, राणीउंचेगाव मंडळात ९३७.९ मिमी, कुंभार पिंपळगाव मंडळात ८९९.० मिमी, जांब समर्थ मंडळात ८०४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक ६३८.४० मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र, ही अपेक्षित सरासरी यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओलांडली आहे. तालुक्यात सरासरी ८७५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गत काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ६३ हजार ३९१.२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज आहे. काही भागात पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे बांध फुटले असून, अशा शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडल्या आहेत.

अनेक पिकांमध्ये अद्यापही पाणी उभा आहे. कापसाच्या पिकाला लाल्या रोगाने घेरले आहे. शिवाय, पावसाच्या व वाऱ्याच्या वेगामुळे कापूस, तूर, मका, ऊस ही पिके भुईसपाट झाली आहेत. याचा फटका ९६ हजार ६४० शेतकऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कोट

मी नियमित खरीप, रब्बी हंगामातील पीकविमा भरत असतो. यावर्षीही विमा प्रीमियमसाठी दोन हजार रुपये भरलेले आहेत. माझे एका एकरचे तुरीचे पीक पावसाने बाधित झाले आहे. सोयाबीन व मूगही हातचा गेला आहे. शासनाने आम्हा शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.

एकनाथ जाधव, शेतकरी घनसावंगी

कोट

मागील वर्षी पिकांचे नुकसान होऊनही कंपनीने विमा भरपाई दिलेली नाही. या वर्षी तालुक्यात पावसाने हाहाकार केला आहे. त्यामुळे या वर्षी तरी विमा कंपनी नुकसानभरपाई देईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी नुकसान होऊनही कंपनीने भरपाई दिली नाही तर भविष्यात कोणताच शेतकरी विमा प्रीमियम भरणार नाहीत.

अशोक हेमके, शेतकरी, बहिरगड

फोटो