शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

६३ हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST

घनसावंगी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे ६३ हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा ९६ हजार ६४० ...

घनसावंगी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे ६३ हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा ९६ हजार ६४० शेतकऱ्यांना फटका बसल्याचा अंदाज आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून तालुक्यातील नुकसानीचे गावनिहाय पंचनामे सुरू आहेत.

तालुक्यात यंदा ८२ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. घनसावंगी मंडळात सर्वाधिक १०६७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ आंतरवाली मंडळात १०४३.४ मिमी, रांजणी मंडळात १०३२.२ मिमी, तीर्थपुरी मंडळात ९६५.१ मिमी, राणीउंचेगाव मंडळात ९३७.९ मिमी, कुंभार पिंपळगाव मंडळात ८९९.० मिमी, जांब समर्थ मंडळात ८०४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक ६३८.४० मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र, ही अपेक्षित सरासरी यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओलांडली आहे. तालुक्यात सरासरी ८७५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गत काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ६३ हजार ३९१.२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज आहे. काही भागात पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे बांध फुटले असून, अशा शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडल्या आहेत.

अनेक पिकांमध्ये अद्यापही पाणी उभा आहे. कापसाच्या पिकाला लाल्या रोगाने घेरले आहे. शिवाय, पावसाच्या व वाऱ्याच्या वेगामुळे कापूस, तूर, मका, ऊस ही पिके भुईसपाट झाली आहेत. याचा फटका ९६ हजार ६४० शेतकऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कोट

मी नियमित खरीप, रब्बी हंगामातील पीकविमा भरत असतो. यावर्षीही विमा प्रीमियमसाठी दोन हजार रुपये भरलेले आहेत. माझे एका एकरचे तुरीचे पीक पावसाने बाधित झाले आहे. सोयाबीन व मूगही हातचा गेला आहे. शासनाने आम्हा शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.

एकनाथ जाधव, शेतकरी घनसावंगी

कोट

मागील वर्षी पिकांचे नुकसान होऊनही कंपनीने विमा भरपाई दिलेली नाही. या वर्षी तालुक्यात पावसाने हाहाकार केला आहे. त्यामुळे या वर्षी तरी विमा कंपनी नुकसानभरपाई देईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी नुकसान होऊनही कंपनीने भरपाई दिली नाही तर भविष्यात कोणताच शेतकरी विमा प्रीमियम भरणार नाहीत.

अशोक हेमके, शेतकरी, बहिरगड

फोटो