शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

६३ हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST

घनसावंगी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे ६३ हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा ९६ हजार ६४० ...

घनसावंगी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे ६३ हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा ९६ हजार ६४० शेतकऱ्यांना फटका बसल्याचा अंदाज आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून तालुक्यातील नुकसानीचे गावनिहाय पंचनामे सुरू आहेत.

तालुक्यात यंदा ८२ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. घनसावंगी मंडळात सर्वाधिक १०६७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ आंतरवाली मंडळात १०४३.४ मिमी, रांजणी मंडळात १०३२.२ मिमी, तीर्थपुरी मंडळात ९६५.१ मिमी, राणीउंचेगाव मंडळात ९३७.९ मिमी, कुंभार पिंपळगाव मंडळात ८९९.० मिमी, जांब समर्थ मंडळात ८०४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक ६३८.४० मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र, ही अपेक्षित सरासरी यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओलांडली आहे. तालुक्यात सरासरी ८७५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गत काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ६३ हजार ३९१.२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज आहे. काही भागात पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे बांध फुटले असून, अशा शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडल्या आहेत.

अनेक पिकांमध्ये अद्यापही पाणी उभा आहे. कापसाच्या पिकाला लाल्या रोगाने घेरले आहे. शिवाय, पावसाच्या व वाऱ्याच्या वेगामुळे कापूस, तूर, मका, ऊस ही पिके भुईसपाट झाली आहेत. याचा फटका ९६ हजार ६४० शेतकऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कोट

मी नियमित खरीप, रब्बी हंगामातील पीकविमा भरत असतो. यावर्षीही विमा प्रीमियमसाठी दोन हजार रुपये भरलेले आहेत. माझे एका एकरचे तुरीचे पीक पावसाने बाधित झाले आहे. सोयाबीन व मूगही हातचा गेला आहे. शासनाने आम्हा शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.

एकनाथ जाधव, शेतकरी घनसावंगी

कोट

मागील वर्षी पिकांचे नुकसान होऊनही कंपनीने विमा भरपाई दिलेली नाही. या वर्षी तालुक्यात पावसाने हाहाकार केला आहे. त्यामुळे या वर्षी तरी विमा कंपनी नुकसानभरपाई देईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी नुकसान होऊनही कंपनीने भरपाई दिली नाही तर भविष्यात कोणताच शेतकरी विमा प्रीमियम भरणार नाहीत.

अशोक हेमके, शेतकरी, बहिरगड

फोटो