शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

आरोग्य प्रश्नावरील लोणीकरांची याचिका न्यायालयाने स्वीकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नियोजनाबद्दलही शंका घेऊन पाहिजे तसे नियोजन न झाल्यानेच ...

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नियोजनाबद्दलही शंका घेऊन पाहिजे तसे नियोजन न झाल्यानेच कोरोनाचे उपचार रुग्णांना वेळेत मिळाले नसल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढल्याचे आ. लोणीकर म्हणाले. या सर्व गंभीर मुद्यांना लक्षात घेऊन आपण ही जनहित याचिका दाखल केल्याचे ते म्हणाले. न्यायालयाने या याचिकेतील सर्व मुद्दे लक्षात घेत ती दाखल करून घेतानाच प्रशासनातील आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ आणि जबाबदार अधिकाऱ्यांसह तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याचेही यावेळी लोणीकरांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ६२/२०२१ या क्रमांकाची जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या याचिकेत त्यांनी जालना जिल्ह्यातील रिक्तपदांसह आरोग्य केंद्रात सीटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन नसणे आदी मुद्दे याचिकेत समाविष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यात प्रामुख्याने

राष्ट्रीय आरोग्य योजनेनुसार ३ हजार लोकसंख्येला १ आरोग्य उपकेंद्र, तर २० हजार लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र, तर ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना १ ग्रामीण रुग्णालय असणे अपेक्षित आहे; परंतु महाराष्ट्रात मात्र त्या विपरीत परिस्थिती आपल्याला दिसून येईल. महाराष्ट्रात एकूण १० हजार ६३८ उपकेंद्र, १ हजार ८२३ प्राथमिक आरोग्य केंद्र, तर २७३ ग्रामीण रुग्णालये आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था प्रचंड भयानक असून जालना जिल्ह्यात ४३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तर केवळ ५ प्रयोगशाळा आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्राला १ प्रयोगशाळा असणे अपेक्षित आहे. ज्या प्रयोगशाळा आहेत त्या प्रयोग शाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाही, अशी दयनीय अवस्था आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहे, असेही लोणीकर यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले.

विद्यार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांची १०३ पैकी केवळ ४९ पदे भरलेली असून ५४ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवकांच्या २७० पैकी १०४ पदे रिक्त आहेत. महिला आरोग्य सेवकांची १७० पदे रिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.