शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही : आ. भाई जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:17 IST

शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला.

ठळक मुद्देसंघर्ष मोर्चाला शेतक-यांनी दिला मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला.परतूर येथे जालना जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष मा. आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयावर भव्य शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख म्हणुन माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी खा. मतुकाराम रेंगे, रा. कॉ. प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, राजाभाऊ देशमुख, अ‍ॅड. अन्वर देशमुख, राजेश राठोड, शेख महेमुद, राजेंद्र राख, किसन मोरे, निळकंठ वायाळे हे होते.पुढे बोलताना आ. जगताप म्हणाले की, आपले गणीत चुकल्याने विरोधकांनी डाव साधला. यांची सत्ता चुकून आल्याने हे असेच वागणार. आज शेतकरी स्वत: ला संपवायला लागला आहे. त्याची दखल घ्यायला हे शासन तयार नाही. चार वर्षात या सरकारने केवळ आश्वासन व पोकळ घोषणा केल्या, प्रत्यक्षात कोणालाच काही दिले नाही. या जॅकेट वाल्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांच्या भावनांचा चक्काचुर केला. चार वर्षात या सरकारने आम्ही आणलेल्या योजनांचे उद्घाटन आणि भाषणच केली. या सरकारन चोरांना कर्ज दिले. महागाई वाढली. शेतकºयांच्या मालाला भाव नाही, तुर बोंडआळीचे पैसे नाही, कर्जमाफी ही फसवी निघाली. गॅस, पट्रोल, डीझेलसह इतर सर्वच वस्तूचे भाव गगनाला नेवून भिडवले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सुरेश कुमार जेथलीया म्हणाले की, या सरकार मधील मंत्र्यांनी सत्तेत येण्यासाठी अनेक मोर्चे काढले. आता मात्र सत्तेत आल्यावर सर्व विसरून गेले. या सरकारच्या सर्व घोषणा सर्व कागदावरच आहे. त्यामुळे येणाºया काळात सरकार पडल्या शिवाय राहणार नाही.या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी गणेश बोराडे, जि. प. सदस्य घनवट, अखिल काजी, राजेश भुजबळ, रहेमु कुरेशी विजय जºहाड, अण्णासाहेब खंदारे यांच्यास कार्यकर्ते उपस्थित होते.परतूर : शेतकरीच धडा शिकवतीलशेतकºयांना कोणतेच अनूदान मिळाले नाही, कर्जमाफीत शेतकºयांना फायदा झाला नाही. आमच्या पालकमंत्र्याच्या लोणी या गावातच शेतकºयांने आज आत्महत्या केली, इतर गावातील आत्महत्या हे काय रोखणार. केवळ बैठका व बदला घेण्याचे राजकारण आमचे पालकमंत्री करीत असल्याचे सांगून या सरकारला धडा आता आमचा शेतकरी बांधवच क रेल असेही मा. आ. जेथलिया यांनी सांगीतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, भाउसाहेब गोरे यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर टिका करीत स्थानिक प्रश्न मांडले. यावेळी नितीन जेथलिया यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Jalanaजालनाcongressकाँग्रेसMorchaमोर्चा