शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही : आ. भाई जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:17 IST

शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला.

ठळक मुद्देसंघर्ष मोर्चाला शेतक-यांनी दिला मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला.परतूर येथे जालना जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष मा. आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयावर भव्य शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख म्हणुन माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी खा. मतुकाराम रेंगे, रा. कॉ. प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, राजाभाऊ देशमुख, अ‍ॅड. अन्वर देशमुख, राजेश राठोड, शेख महेमुद, राजेंद्र राख, किसन मोरे, निळकंठ वायाळे हे होते.पुढे बोलताना आ. जगताप म्हणाले की, आपले गणीत चुकल्याने विरोधकांनी डाव साधला. यांची सत्ता चुकून आल्याने हे असेच वागणार. आज शेतकरी स्वत: ला संपवायला लागला आहे. त्याची दखल घ्यायला हे शासन तयार नाही. चार वर्षात या सरकारने केवळ आश्वासन व पोकळ घोषणा केल्या, प्रत्यक्षात कोणालाच काही दिले नाही. या जॅकेट वाल्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांच्या भावनांचा चक्काचुर केला. चार वर्षात या सरकारने आम्ही आणलेल्या योजनांचे उद्घाटन आणि भाषणच केली. या सरकारन चोरांना कर्ज दिले. महागाई वाढली. शेतकºयांच्या मालाला भाव नाही, तुर बोंडआळीचे पैसे नाही, कर्जमाफी ही फसवी निघाली. गॅस, पट्रोल, डीझेलसह इतर सर्वच वस्तूचे भाव गगनाला नेवून भिडवले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सुरेश कुमार जेथलीया म्हणाले की, या सरकार मधील मंत्र्यांनी सत्तेत येण्यासाठी अनेक मोर्चे काढले. आता मात्र सत्तेत आल्यावर सर्व विसरून गेले. या सरकारच्या सर्व घोषणा सर्व कागदावरच आहे. त्यामुळे येणाºया काळात सरकार पडल्या शिवाय राहणार नाही.या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी गणेश बोराडे, जि. प. सदस्य घनवट, अखिल काजी, राजेश भुजबळ, रहेमु कुरेशी विजय जºहाड, अण्णासाहेब खंदारे यांच्यास कार्यकर्ते उपस्थित होते.परतूर : शेतकरीच धडा शिकवतीलशेतकºयांना कोणतेच अनूदान मिळाले नाही, कर्जमाफीत शेतकºयांना फायदा झाला नाही. आमच्या पालकमंत्र्याच्या लोणी या गावातच शेतकºयांने आज आत्महत्या केली, इतर गावातील आत्महत्या हे काय रोखणार. केवळ बैठका व बदला घेण्याचे राजकारण आमचे पालकमंत्री करीत असल्याचे सांगून या सरकारला धडा आता आमचा शेतकरी बांधवच क रेल असेही मा. आ. जेथलिया यांनी सांगीतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, भाउसाहेब गोरे यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर टिका करीत स्थानिक प्रश्न मांडले. यावेळी नितीन जेथलिया यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Jalanaजालनाcongressकाँग्रेसMorchaमोर्चा