शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

CoronaVirus : राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य वाटप करावे : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:54 IST

केंद्राकडून २० लाख मेट्रीक टन धान्य उपलब्ध

जालना : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिब जनतेला स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून राज्य सरकारने तीन महिन्यांच्या नियमित अन्नधान्याच्या साठ्यासह केंद्राकडून मिळणाऱ्या पाच किलो तांदळाचे वाटप करावे, अशी अपेक्षा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

दानवे यांनी शनिवारी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे. तो गोरगरीब जनतेला द्यावा, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान अन्न योजना, पंतप्रधान कसान सन्मान निधी यासह अन्य माध्यमातून शेतकरी आणि गरिबांना मदत केली जात आहे. यासाठी केंद्र सरकारने एक लाख ७० हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

अंत्योदय योजना, प्राधान्य कुुटुंब योजना या अंतर्गत २ रूपये किलो गहू आणि ३ रूपये किलो तांदूळ हे नियमितपणे वितरित केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त तीन महिन्यांचे धान्य देण्यासाठी एफसीआय मार्फत राज्य सरकारकडे १२ लाख मेट्रीक टन गहू आणि ८ लाख मेट्रीक टन तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. अन्न धान्य उपलब्ध असताना राज्य सरकार ३ महिन्यांचे धान्य का वाटत नाही ? हा संशोधनाचा विषय आहे. राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य द्यावे, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते संपर्कात असल्याचे दानवे म्हणाले. महाराष्ट्राला आणखी अन्नधान्य विशेष करून गहू देण्यासाठी हरियाणा आणि पंजाबमधून १६ मालगाड्यांमधून ५० हजार टन गहू उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. देशात १.६२ लाख मेट्रीक टन धान्याचा साठा वेगवेगळ्या राज्यांना ४१० रेल्वेद्वारे पुरविला जात आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात अन्नधान्य असल्याने राज्य सरकारने तीन महिन्याचा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली. यावेळी आ. नारायण कुचे, भाजपाचे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती होती.लॉकडाऊनचे पालन व्हावेपरदेशातून आलेले नागरिक आणि दिल्ली येथील मरकजचे संमेलन यामुळे कोरोनाचा फैलाव झाला आहे. हा संसर्ग आणखी पसरू नये म्हणून प्रत्येकाने लॉकडाऊनचे पालन करावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री दानवे यांनी व्यक्त केली. रविवारी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार दिवे लावून एकोपा दाखविण्याचेजे आवाहन केले त्यात सहभागी होताना सुरक्षित अंतर ठेवावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालनाraosaheb danveरावसाहेब दानवे