शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य वाटप करावे : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:54 IST

केंद्राकडून २० लाख मेट्रीक टन धान्य उपलब्ध

जालना : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिब जनतेला स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून राज्य सरकारने तीन महिन्यांच्या नियमित अन्नधान्याच्या साठ्यासह केंद्राकडून मिळणाऱ्या पाच किलो तांदळाचे वाटप करावे, अशी अपेक्षा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

दानवे यांनी शनिवारी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे. तो गोरगरीब जनतेला द्यावा, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान अन्न योजना, पंतप्रधान कसान सन्मान निधी यासह अन्य माध्यमातून शेतकरी आणि गरिबांना मदत केली जात आहे. यासाठी केंद्र सरकारने एक लाख ७० हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

अंत्योदय योजना, प्राधान्य कुुटुंब योजना या अंतर्गत २ रूपये किलो गहू आणि ३ रूपये किलो तांदूळ हे नियमितपणे वितरित केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त तीन महिन्यांचे धान्य देण्यासाठी एफसीआय मार्फत राज्य सरकारकडे १२ लाख मेट्रीक टन गहू आणि ८ लाख मेट्रीक टन तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. अन्न धान्य उपलब्ध असताना राज्य सरकार ३ महिन्यांचे धान्य का वाटत नाही ? हा संशोधनाचा विषय आहे. राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य द्यावे, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते संपर्कात असल्याचे दानवे म्हणाले. महाराष्ट्राला आणखी अन्नधान्य विशेष करून गहू देण्यासाठी हरियाणा आणि पंजाबमधून १६ मालगाड्यांमधून ५० हजार टन गहू उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. देशात १.६२ लाख मेट्रीक टन धान्याचा साठा वेगवेगळ्या राज्यांना ४१० रेल्वेद्वारे पुरविला जात आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात अन्नधान्य असल्याने राज्य सरकारने तीन महिन्याचा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली. यावेळी आ. नारायण कुचे, भाजपाचे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती होती.लॉकडाऊनचे पालन व्हावेपरदेशातून आलेले नागरिक आणि दिल्ली येथील मरकजचे संमेलन यामुळे कोरोनाचा फैलाव झाला आहे. हा संसर्ग आणखी पसरू नये म्हणून प्रत्येकाने लॉकडाऊनचे पालन करावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री दानवे यांनी व्यक्त केली. रविवारी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार दिवे लावून एकोपा दाखविण्याचेजे आवाहन केले त्यात सहभागी होताना सुरक्षित अंतर ठेवावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालनाraosaheb danveरावसाहेब दानवे