शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

CoronaVirus : राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य वाटप करावे : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:54 IST

केंद्राकडून २० लाख मेट्रीक टन धान्य उपलब्ध

जालना : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिब जनतेला स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून राज्य सरकारने तीन महिन्यांच्या नियमित अन्नधान्याच्या साठ्यासह केंद्राकडून मिळणाऱ्या पाच किलो तांदळाचे वाटप करावे, अशी अपेक्षा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

दानवे यांनी शनिवारी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे. तो गोरगरीब जनतेला द्यावा, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान अन्न योजना, पंतप्रधान कसान सन्मान निधी यासह अन्य माध्यमातून शेतकरी आणि गरिबांना मदत केली जात आहे. यासाठी केंद्र सरकारने एक लाख ७० हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

अंत्योदय योजना, प्राधान्य कुुटुंब योजना या अंतर्गत २ रूपये किलो गहू आणि ३ रूपये किलो तांदूळ हे नियमितपणे वितरित केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त तीन महिन्यांचे धान्य देण्यासाठी एफसीआय मार्फत राज्य सरकारकडे १२ लाख मेट्रीक टन गहू आणि ८ लाख मेट्रीक टन तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. अन्न धान्य उपलब्ध असताना राज्य सरकार ३ महिन्यांचे धान्य का वाटत नाही ? हा संशोधनाचा विषय आहे. राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य द्यावे, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते संपर्कात असल्याचे दानवे म्हणाले. महाराष्ट्राला आणखी अन्नधान्य विशेष करून गहू देण्यासाठी हरियाणा आणि पंजाबमधून १६ मालगाड्यांमधून ५० हजार टन गहू उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. देशात १.६२ लाख मेट्रीक टन धान्याचा साठा वेगवेगळ्या राज्यांना ४१० रेल्वेद्वारे पुरविला जात आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात अन्नधान्य असल्याने राज्य सरकारने तीन महिन्याचा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली. यावेळी आ. नारायण कुचे, भाजपाचे उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची उपस्थिती होती.लॉकडाऊनचे पालन व्हावेपरदेशातून आलेले नागरिक आणि दिल्ली येथील मरकजचे संमेलन यामुळे कोरोनाचा फैलाव झाला आहे. हा संसर्ग आणखी पसरू नये म्हणून प्रत्येकाने लॉकडाऊनचे पालन करावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री दानवे यांनी व्यक्त केली. रविवारी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार दिवे लावून एकोपा दाखविण्याचेजे आवाहन केले त्यात सहभागी होताना सुरक्षित अंतर ठेवावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालनाraosaheb danveरावसाहेब दानवे