शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : उत्तरप्रदेशमध्ये जाणाऱ्या कामगारांसाठी विशेष रेल्वे; ५९५ रूपये रेल्वे भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 19:22 IST

कामगारांना तहसील कार्यालयात ५९५ रूपये रेल्वे भाडे भरून नोंदणी करावी लागणार    

ठळक मुद्दे१२०० प्रवाशांची नोंदणी झाल्यानंतर होणार मार्गस्थ

जालना : करमाडजवळ रेल्वे अपघातात १७ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर परप्रांतीय कामगार, मजुरांना परत पाठविण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कामगारांनी आपापल्या तहसील कार्यालयात ५९५ रूपये रेल्वे भाडे भरून नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील उन्नाव जिल्ह्यात जाण्यासाठी १२०० जणांची नोंद झाल्यानंतर पहिली विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.

जालना येथील कंपनीत काम करणाऱ्या १७ परप्रांतीय मजुरांचा करमाड नजीक झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने परप्रांतीय मजुरांना परत पाठविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात जाणाऱ्या कामगार, मजुरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ५९५ रूपये भाडे आकारण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या याद्यानुसार राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे संचालक मनोज देशमुख हे रेल्वे विभागाशी संपर्क साधणार आहेत. १२०० जणांची नोंद झाल्यानंतर रेल्वे विभागाकडून त्यांच्या तिकीटाची सोय करण्यात येणार आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर हे संबंधितांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र, मास्क देण्याचे नियोजन करणार आहेत. संबंधित कामगार, मजुरांनी आपल्या भागातील तहसील कार्यालयाकडे रेल्वे भाडे आणि आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

११०३ अहवाल निगेटिव्हजालना जिल्ह्यात आजवर ११९५ कोरोना संशयित आढळून आले आहेत. स्वॅब घेतलेल्यांपैकी ११०३  जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर केवळ ८ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एक महिला कोरोनामुक्त झाली असून, इतर ७ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुर्न तपासणीसाठी २२८ स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्र्यांकडे केला पाठपुरावाजालना तसेच मराठवाड्यातील अन्य भागांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. या सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यात आणि मूळ गावी जायचे आहे. यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याकरिता आपण रेल्वेमंत्री पियूश गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने या विनंतीला मान दिला. लवकरच जालना येथून प्रवासी संख्या निश्चित झाल्यानंतर विशेष रेल्वे सोडली जाणार आहे.- रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना