शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

coronavirus : ना कोरोनाची दहशत, ना संचारबंदीची भीती; जालनेकरांना गांभीर्य कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:31 IST

सकाळी १०.३० पर्यंत प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचा-यांची वर्दळ कायम होती.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात सोमवारी रात्रीपर्यंत ४५ संशयित आढळून आले आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतरच वर्दळ थांबणार का?

जालना : जालनेकर सध्यातरी कोरोना विषाणूला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश दुकाने बंद असून, संचारबंदी लागू आहे. मात्र, तरीही मंगळवारी सकाळी १०.३० पर्यंत प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाºयांची वर्दळ कायम होती.

जालना जिल्ह्यात सोमवारी रात्रीपर्यंत ४५ संशयित आढळून आले आहेत. पैकी १० जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पहिल्या टप्प्यात शनिवारी २१ मार्च रोजी जिल्हा बंदचे आवहान केले होते. मात्र, शनिवारी दिवसभर दुकाने बंद आणि नागरिक रस्त्यावर अशीच अवस्था जालना शहरासह जिल्हाभरात होती. दुस-या दिवशी रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू कडकडीत पाळण्यात आला. मात्र, सायंकाळी ५ नंतर टाळ्या, थाळ्या वाजविण्यासाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांची रहदारी रात्री उशिरापर्यंत कायम होती. संपूर्ण राज्यातच असे चित्र असल्याने शासनाने सोमवारी सायंकाळी संचारबंदी लागू केली. किमान संचारबंदीमुळे तरी नागरिक घरात बसून कोरोनाशी लढा देतील, अशी अपेक्षा शासन, प्रशासनाला होती. मात्र, मंगळवारी सकाळी १०.३० पर्यंत तरी जालना शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची रहदारी कायम होती.

पोलीस दलाच्या वतीने चौका-चौकात बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेष पथके शहरभर फिरून आवश्यकता नसताना घराबाहेर फिरू नये, घरात बसावे, असे आवाहन करीत आहेत. मात्र, रस्त्यावरील वर्दळ कायम असून, जालनेकरांच्या मनात ना कोरोनाची दहशत ना संचारबंदीची भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी आता हातात दांडुका घेऊन सक्ती केल्यानंतच रस्त्यावरील वर्दळ थांबणार का? असाच प्रश्न आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalna Policeजालना पोलीसJalanaजालना