शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

CoronaVirus : कोरोना खबरदारी ! छुप्या मार्गाने जालन्यात आलेल्यांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:32 IST

सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळी आलेल्या जवळपास २६ संशयितांचे स्वॅब औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्ययात आले आहेत

ठळक मुद्देजालन्या शेजारील औरंगाबाद आणि  बुलढाणा हे दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये आहेत.

जालना : जालना जिल्ह्यातील दोन कोरोना पॉझिटिव्ह महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे असले तरी, नवीन संशयित रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळी आलेल्या जवळपास २६ संशयितांचे स्वॅब औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी दिली. दरम्यान शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होत चालल्याने जिल्हा प्रशासनाने अनेक कडक निर्णय घेतले आहेत. छुप्या मार्गाने जालन्यात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. 

जालन्या शेजारील औरंगाबाद आणि  बुलढाणा हे दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. असे असले तरी, अनेक नागरिक हे छुप्या मार्गाने जालन्यात या दोन्ही जिल्ह्यातून दाखल होत आहेत. आता या छुप्या मार्गावरही महसूल तसेच आरोग्य आणि पोलीस विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यापूर्वी जे नागरिक अशा मार्गाने दाखल झाले आहेत, त्यांचा शोध घेण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिका-यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार ग्रामसेवक, तलाठी आणि मंडळ अधिका-यांची याकामी मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच औरंगाबादमध्ये कोरोना कहर वाढत असल्याने जालनेकरांना आताच सतर्क राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात निर्णय घेऊन सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी बिनवडेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, अपर जिल्हाधिकररी रवींद्र परळीकर यांच्यासह अन्य प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

पोलिसांनी अधिक सतर्क राहावेया आढावा बैठकीस उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनाही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना चेकपोस्टवर अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष करून अनेक अधिकारी, कर्मचारी हे आजही औरंगाबाद येथून जालन्यात येत आहेत. यावर नजर ठेवण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापुढे केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची परवानगी असेल तरच त्यांना औरंगाबादला जाता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालनाPoliceपोलिस