शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बांधकामाचे साहित्य गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:35 IST

मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुरात वाहून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील धामना नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे. मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुरात वाहून गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे बांधकाम रखडल्याने ग्रामस्थांत संताप आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने धामना नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी तीन महिन्यांपासून खडी, गिट्टी, सळई इ. साहित्य आणून टाकले आहे. याला तीन महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाचे दिवस असल्याने नदीच्या प्रवाहात साहित्य वाहून जाण्याची भीती लोकमतने १४ जून रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तात व्यक्त केली होती. मात्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले.सोमवार आणि मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने पुलाच्या बांधकामासाठी आणलेली खडी, वाळू आणि लोखंडी सळई पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे पुलाच्या बांधकामाला आता जास्तीचा विलंब होणार असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी केली असून दोषीवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. तीन महिन्यांपासून धामना नदीवरील पुलाचे बांधकाम रखडले होते. परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास रस्ताच नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असल्याने या मार्गावरुन अनेकांना ये- जा करावा लागतो. पुलाचे काम तीन महिन्यांपासून रखडल्याने बाजारकरूंची तसेच दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडत आहे. यामुळे बाजाराला येणा-या दुकानदारांची संख्या रोडावली. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे हा मार्ग मराठवाडा विदर्भ आणि खान्देशला जोडणारा मुख्य मार्ग आहे. याच मार्गावर पुढे भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव, धावडा, शिवणा यानंतर अजिंठा गाव लागते. मात्र, पुलाचे बांधकाम रखडल्याने या मार्गावरुन ये- जा करण्यास अडचणी येत आहेत. तसेच परिसरातील शेतक-यांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग