शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

बांधकामाचे साहित्य गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:35 IST

मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुरात वाहून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील धामना नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे. मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुरात वाहून गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे बांधकाम रखडल्याने ग्रामस्थांत संताप आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने धामना नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी तीन महिन्यांपासून खडी, गिट्टी, सळई इ. साहित्य आणून टाकले आहे. याला तीन महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाचे दिवस असल्याने नदीच्या प्रवाहात साहित्य वाहून जाण्याची भीती लोकमतने १४ जून रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तात व्यक्त केली होती. मात्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले.सोमवार आणि मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने पुलाच्या बांधकामासाठी आणलेली खडी, वाळू आणि लोखंडी सळई पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे पुलाच्या बांधकामाला आता जास्तीचा विलंब होणार असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी केली असून दोषीवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. तीन महिन्यांपासून धामना नदीवरील पुलाचे बांधकाम रखडले होते. परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास रस्ताच नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असल्याने या मार्गावरुन अनेकांना ये- जा करावा लागतो. पुलाचे काम तीन महिन्यांपासून रखडल्याने बाजारकरूंची तसेच दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडत आहे. यामुळे बाजाराला येणा-या दुकानदारांची संख्या रोडावली. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे हा मार्ग मराठवाडा विदर्भ आणि खान्देशला जोडणारा मुख्य मार्ग आहे. याच मार्गावर पुढे भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव, धावडा, शिवणा यानंतर अजिंठा गाव लागते. मात्र, पुलाचे बांधकाम रखडल्याने या मार्गावरुन ये- जा करण्यास अडचणी येत आहेत. तसेच परिसरातील शेतक-यांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग