शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

२४ हजार शेतकऱ्यांच्या आधारचे लिंकिंग पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:44 IST

शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे. तर अद्यापही ६ हजार ५५९ शेतक-यांचा आधार क्रमांक कर्जखात्याशी लिंक करण्याचे काम सुरू आहे.शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत व परतफेड न केलेले अल्पमुदती पिककर्ज, पुनर्गठीत पिककर्ज, फेर पुनर्गठीत पिककर्ज असलेले २ लाख ४ हजार ४६२ शेतकरी जालना जिल्ह्यात आहेत. पैकी १ लाख ७२ हजार ९०८ शेतक-यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक लिंक होता. मात्र, ३१ हजार ५५४ शेतक-यांचा आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक झालेला नव्हता. शासन निर्देशानुसार आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक नसलेल्या शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.याद्या प्रसिध्द झाल्यानंतर आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतक-यांनी आपला आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक करून घेतला आहे. ६ हजार शेतक-यांचे काम अद्याप अपूर्णशासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय निकषात असलेल्या शेतक-यांनी आधार क्रमांक कर्ज खात्याशी संलग्न करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत अद्यापही जालना जिल्ह्यातील ६ हजार ५५९ शेतक-यांचा आधार क्रमांक कर्ज खात्याशी संलग्न झालेला नाही. यात सर्वाधिक एसबीआयचे १९४५ तर जिल्हा बँकेतील १४११, युनियन बँक आॅफ इंडियातील ११६४ शेतक-यांसह इतर बँकेतील शेतक-यांचा यात समावेश आहे.नियमित कर्ज फेडणारे२ लाख शेतकरीजिल्हा बँकेंतर्गत कर्ज घेतल्यानंतर ते नियमित फेडणा-या शेतक-यांची संख्या २ लाख १६ हजार २३१ इतकी आहे. या शेतक-यांनी ३७७ कोटी ९९ लाख ६३ हजार रूपयांचे कर्ज फेडले आहे. शासनाने कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांसाठी विशेष योजना जाहीर केली तर तब्बल २ लाख १६ हजार २३१ शेतक-यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्ड