शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

दिलासा ! मराठवाड्यात ५६५ सार्वजनिक विहिरींची कामे पूर्ण; ३ हजार कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 15:17 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

ठळक मुद्देदुष्काळावर मात करण्यासाठी साडेपाच हजार विहिरींची कामे

- दीपक ढोले

जालना : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आठही जिल्ह्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५५१३ सार्वजनिक विहिरींची कामे केली जाणार आहेत. या मोहिमेत आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. विहिरीतून पाणी शेंदतांना अनेकांना जीव गमवावा लागला. तहान भागविण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला. टँकरवरील खर्च टाळण्यासाठी व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलावाच्या ठिकाणी किंवा पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सार्वजनिक विहिरींची कामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

मराठवाड्यात तब्बल ५५१३ विहिरींची कामे करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. या सार्वजनिक विहिरींद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ५५१३ पैकी ४९७१ विहिरींना तांत्रिक मान्यता देण्यात आली. ४५०५ विहिरींना कार्यारंभ आदेश देण्यात आले. ४२६४ विहिरींची स्थळ पाहणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गतवर्षी ३०७४ विहिरींची कामे पूर्ण सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचे जालना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी सांगितले. दरम्यान, सध्या मुबलक पाणी असल्याने बहुतांश विहिरींची कामे बंद आहेत.

जालना टॉपवर; अनेकांना मिळाला रोजगारमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जालना जिल्ह्याला ६०७ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६६ विहिरींची कामे सुरू करण्यात आली असून, १८० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मराठवाड्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींची कामे पूर्ण झाली. ३३८ विहिरींना पाणीदेखील लागल्याचे इंगळे यांनी सांगितले.दुष्काळात बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी या विहिरींची कामे मजुरांमार्फत करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार विहिरींची कामेही मजुरांमार्फत केली जात आहेत. या संकल्पनेमुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहेत.

जिल्हानिहाय पूर्ण झालेल्या विहिरींची संख्याजिल्हा             सुरू विहिरी             पूर्ण विहिरीऔंरगाबाद            २६२                        २४

जालना                ४६६                       १८०बीड                     ३७८                       १०६

परभणी              ३२७                         ६१हिंगोली              ५२४                         ९१

नांदेड                 २८५                        ३७लातूर                 ३४५                       ४५

उस्मानाबाद       ४८७                       २१ 

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ