शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

दिलासा ! मराठवाड्यात ५६५ सार्वजनिक विहिरींची कामे पूर्ण; ३ हजार कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 15:17 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

ठळक मुद्देदुष्काळावर मात करण्यासाठी साडेपाच हजार विहिरींची कामे

- दीपक ढोले

जालना : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आठही जिल्ह्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५५१३ सार्वजनिक विहिरींची कामे केली जाणार आहेत. या मोहिमेत आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. विहिरीतून पाणी शेंदतांना अनेकांना जीव गमवावा लागला. तहान भागविण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला. टँकरवरील खर्च टाळण्यासाठी व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलावाच्या ठिकाणी किंवा पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सार्वजनिक विहिरींची कामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

मराठवाड्यात तब्बल ५५१३ विहिरींची कामे करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. या सार्वजनिक विहिरींद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ५५१३ पैकी ४९७१ विहिरींना तांत्रिक मान्यता देण्यात आली. ४५०५ विहिरींना कार्यारंभ आदेश देण्यात आले. ४२६४ विहिरींची स्थळ पाहणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गतवर्षी ३०७४ विहिरींची कामे पूर्ण सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचे जालना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी सांगितले. दरम्यान, सध्या मुबलक पाणी असल्याने बहुतांश विहिरींची कामे बंद आहेत.

जालना टॉपवर; अनेकांना मिळाला रोजगारमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जालना जिल्ह्याला ६०७ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६६ विहिरींची कामे सुरू करण्यात आली असून, १८० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मराठवाड्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींची कामे पूर्ण झाली. ३३८ विहिरींना पाणीदेखील लागल्याचे इंगळे यांनी सांगितले.दुष्काळात बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी या विहिरींची कामे मजुरांमार्फत करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार विहिरींची कामेही मजुरांमार्फत केली जात आहेत. या संकल्पनेमुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहेत.

जिल्हानिहाय पूर्ण झालेल्या विहिरींची संख्याजिल्हा             सुरू विहिरी             पूर्ण विहिरीऔंरगाबाद            २६२                        २४

जालना                ४६६                       १८०बीड                     ३७८                       १०६

परभणी              ३२७                         ६१हिंगोली              ५२४                         ९१

नांदेड                 २८५                        ३७लातूर                 ३४५                       ४५

उस्मानाबाद       ४८७                       २१ 

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ