शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

दिलासा ! मराठवाड्यात ५६५ सार्वजनिक विहिरींची कामे पूर्ण; ३ हजार कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 15:17 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

ठळक मुद्देदुष्काळावर मात करण्यासाठी साडेपाच हजार विहिरींची कामे

- दीपक ढोले

जालना : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आठही जिल्ह्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५५१३ सार्वजनिक विहिरींची कामे केली जाणार आहेत. या मोहिमेत आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. विहिरीतून पाणी शेंदतांना अनेकांना जीव गमवावा लागला. तहान भागविण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला. टँकरवरील खर्च टाळण्यासाठी व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलावाच्या ठिकाणी किंवा पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सार्वजनिक विहिरींची कामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

मराठवाड्यात तब्बल ५५१३ विहिरींची कामे करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. या सार्वजनिक विहिरींद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ५५१३ पैकी ४९७१ विहिरींना तांत्रिक मान्यता देण्यात आली. ४५०५ विहिरींना कार्यारंभ आदेश देण्यात आले. ४२६४ विहिरींची स्थळ पाहणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गतवर्षी ३०७४ विहिरींची कामे पूर्ण सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचे जालना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी सांगितले. दरम्यान, सध्या मुबलक पाणी असल्याने बहुतांश विहिरींची कामे बंद आहेत.

जालना टॉपवर; अनेकांना मिळाला रोजगारमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जालना जिल्ह्याला ६०७ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६६ विहिरींची कामे सुरू करण्यात आली असून, १८० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मराठवाड्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींची कामे पूर्ण झाली. ३३८ विहिरींना पाणीदेखील लागल्याचे इंगळे यांनी सांगितले.दुष्काळात बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी या विहिरींची कामे मजुरांमार्फत करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार विहिरींची कामेही मजुरांमार्फत केली जात आहेत. या संकल्पनेमुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहेत.

जिल्हानिहाय पूर्ण झालेल्या विहिरींची संख्याजिल्हा             सुरू विहिरी             पूर्ण विहिरीऔंरगाबाद            २६२                        २४

जालना                ४६६                       १८०बीड                     ३७८                       १०६

परभणी              ३२७                         ६१हिंगोली              ५२४                         ९१

नांदेड                 २८५                        ३७लातूर                 ३४५                       ४५

उस्मानाबाद       ४८७                       २१ 

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ