शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

सुशिक्षित वर्ग ‘सायबर क्राईम’च्या जाळ्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 1:05 AM

सुशिक्षित आता सायबर क्राईमच्या जाळ्यात येत असल्याचे चित्र मागील अडीच वर्षात दाखल गुन्ह्यांवरून दिसते.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आॅनलाईन व्यवहार करण्यावर सुशिक्षितांनी भर दिला. मात्र, हेच सुशिक्षित आता सायबर क्राईमच्या जाळ्यात येत असल्याचे चित्र मागील अडीच वर्षात दाखल गुन्ह्यांवरून दिसते. या कालावधीत १३ जणांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांना जवळपास १८ लाखांचा चुना चोरट्यांनी लावला आहे.पूर्वी बहुतांश ग्राहक थेट बँकेत जाऊन व्यवहार करीत होते. मात्र, इंटरनेटचा वाढलेला वापर आणि केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमानंतर आॅनलाईन व्यवहारावर सुशिक्षितांनी मोठा भर दिला. त्यातच विविध कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर विविध आॅफर देण्यास सुरू केली. त्यामुळे आॅनलाईन साहित्य खरेदीकडेही कल वाढला आहे. मात्र, आॅनलाईन व्यवहार करताना दक्षता न घेणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे सायबर चोरांच्या जाळ्यात असे ग्राहक सहजपणे अडकू लागले आहेत.२०१७ ते जून २०१९ या कालावधीत दाखल १८ गुन्ह्यांचा तपास सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. दाखल गुन्ह्यांपैकी १३ प्रकरणांमध्ये फेक कॉल करून खोटे आमिष दाखविणे, आॅनलाईन खोट्या जाहिराती देऊन बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रकार घडला आहे. २०१७ मध्ये एकाला कमी किमतीच्या आय-फोनच्या मोहात ८ हजार रूपयांना आॅनलाईन चुना लागला आहे. २०१८ मध्ये सायबर क्राईमचे १० गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील ६ प्रकरणांत आॅनलाईन लूट झालेली आहे. यात १५ हजार ते दीड लाख रूपयापर्यंतची रक्कम लंपास झालेली आहे. तर चालू वर्षात आजवर सायबर क्राईमचे सहा गुन्हे दाखल झालेले आहेत. विशेषत: या सर्व सहा जणांचीही आॅनलाईन फसवणूक झाली आहे. १० हजार ते १२ लाख रूपयांची रक्कम खात्यातून लंपास करण्यात आली आहे. या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आॅनलाईन व्यवहार करताना दक्षता घेणे गरजेचे आहे.फेक कॉलवर दिली जाते ओटीपी, बँक खात्याची माहिती‘फेक कॉल’द्वारे दिल्या जाणा-या आमिषालाही अनेक जण बळी पडत आहेत. कमी किंमतीत चांगली वस्तू मिळणे असो किंवा नोकरी मिळणे असो हे संबंधितांच्या अंगाशी येत आहे.ओटीपीसह बँक खात्याची माहिती मागितल्यानंतर सुशिक्षित ग्राहक अनोळखी व्यक्तीला माहिती देत आहेत. त्यामुळे फसवणूक होण्याचे प्रकार वाढले असून, ग्राहकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.आक्षेपार्ह मजकूरही अंगलटव्हाटस् अ‍ॅप, फेसबुक इ. सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मात्र, बनावट खाती काढून एखाद्याची बदनामी करणारे किंवा आक्षेपार्ह मजकूर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.अशा मजकुरामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस दलाकडूनच आता सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात असून, आक्षेपार्ह मजकूर टाकणा-या ६ जणांवर मागील अडीच वर्षात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.२ लाख ८० हजार ‘रिकव्हर’आजवर दाखल सायबर गुन्ह्यांमध्ये जवळपास १८ लाख ४१ हजार रूपयांचा चुना संबंधितांना लागला आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या तपासात जवळपास २ लाख ८० हजार रूपये रक्कम परत मिळविण्यात आली आहे. मात्र, अशा आॅनलाईन व्यवहारात अनेकांची नावे, बँक खाती बनावट असल्याने चोरट्यांचा तपास लागणे मुश्किल होत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीJalna Policeजालना पोलीस