शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

टाक्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:13 IST

नळाला अथवा विकत घेतलेले पाणी साठविण्यासाठी बाजारात प्लास्टिकच्या टाक्या, बॅरल खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. तसेच जायकवाडी धरणातूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शहराला आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो. नळाला अथवा विकत घेतलेले पाणी साठविण्यासाठी बाजारात प्लास्टिकच्या टाक्या, बॅरल खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात यंदा पुरेशा प्रमाणात पाणी साठले नाही. यामुळे मार्च महिन्यापर्यत घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. यामुळे तीन ते चार दिवसांनी येणारे पाणी आता आठवड्यातून एकदा येत आहे. तलावात पुरेशा प्रमाणात पाणी असतांनाही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन्ही ऋतूतही नागरिकांची पाण्याविना गैरसोय होते, परिणामी अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागते.यामुळे शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातही पाणीटंचाई तीव्र झाली आहे. यामुळे पाणी साठविण्यासाठी नागरिकाकडून प्लास्टिकच्या टाक्याची मागणी वाढली आहे. शहरातील मामाचौक, बाजार परिसरात असलेल्या दुकानांमध्ये प्लास्टिकच्या टाक्याखरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.पाण्याची नासाडीशहरात पाणी सोडण्याची कुठलीच ठराविक वेळ नाही. यामुळे रात्री - बेरात्री नळाला पाणी येते. तसेच शहरातील बहुतांश नळाला तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पिण्यायोग्य पाणी वाहून जाते. एकीकडे पाणी नसल्याची ओरड होत असतांना पाण्याच्या नासाडीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांचे हाल सुरु आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMarketबाजार