शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कान- नाक-घशाच्या आजारांनी बालके झाली त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:20 IST

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, शाळांमध्ये करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत अनेक विद्यार्थी कान-नाक- घशाच्या आजारांनी त्रस्त झाल्याचे समोर आले आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, शाळांमध्ये करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत अनेक विद्यार्थी कान-नाक- घशाच्या आजारांनी त्रस्त झाल्याचे समोर आले आहे. या आजाराने ग्रासलेल्या ११२ बालकांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर दंतविकाराच्या १७३ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आरोग्याची दक्षता घ्यायची सवय लागणे, त्यांच्यातील आजाराची वेळेवर माहिती होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम उपयोगी पडत आहे. जिल्हा रूग्णालयामार्फत चालणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. बालके, विद्यार्थ्यांच्या तपासणीत ह्दयविकार, कान-नाक-घशाचे आजार, दंतविकार, हाडांच्या आजाराची विद्यार्थ्यांना अधिक लागण झाल्याचे समोर आले आहे. प्रथमोपचारानंतरही ज्या बालकांचे, विद्यार्थ्यांचे आजार कमी होत नाही, अशांवर गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यात कान-नाक- घशाचे आजार असलेल्या ११२ जणांवर गत दीड वर्षात शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गतवर्षभरात ८६ जणांवर तर चालू वर्षात २६ जणांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दंतविकारही अनेक बालकांना आढळून आले आहेत. गत वर्षभरात १३० जणांच्या तर चालू वर्षात १२ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हाडांचे विविध गंभीर आजार असलेल्या २४ जणांवरही जिल्हा रूग्णालयामार्फत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत ह्रदयाचा आजार असलेले तब्बल ३५९ विद्यार्थी आढळून आले होते. यातील १४० जणांची इको टुडी तपासणी करण्यात आली. तपासणीत गंभीर आजार असलेल्या ६२ जणांवर मुंबई, औरंगाबाद येथील रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शासकीय खर्चातून झालेल्या शस्त्रक्रियेमुळे पालकांनाही मोठा आधार मिळाला आहे. याशिवाय अपेंडिक्स, किडनी व इतर आजारांनी ग्रासलेल्या मुलांवरही राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.दुभंगलेल्या ओठ, टाळूवर शस्त्रक्रियाअनेक बालकांचे जन्मत:च ओठ, टाळू दुभंगलेले असतात. त्यामुळे या बालकांना शारीरिक विकलांगपणा येतो.ओठ, टाळू दुभंगलेल्या ९५ बालकांवर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार करण्यात आले आहेत.जिल्ह्यात ३२ पथकेराष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तब्बल ३२ पथके कार्यरत आहेत. यात महिला, पुरूष वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता, एक परिचारिकेचा समावेश आहे. कार्यक्रम पर्यवेक्षक विद्या म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ठरलेल्या नियोजनानुसार दररोज ही पथके विद्यार्थ्यांची तपासणी करीत आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य