शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कान- नाक-घशाच्या आजारांनी बालके झाली त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:20 IST

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, शाळांमध्ये करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत अनेक विद्यार्थी कान-नाक- घशाच्या आजारांनी त्रस्त झाल्याचे समोर आले आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, शाळांमध्ये करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत अनेक विद्यार्थी कान-नाक- घशाच्या आजारांनी त्रस्त झाल्याचे समोर आले आहे. या आजाराने ग्रासलेल्या ११२ बालकांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर दंतविकाराच्या १७३ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आरोग्याची दक्षता घ्यायची सवय लागणे, त्यांच्यातील आजाराची वेळेवर माहिती होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम उपयोगी पडत आहे. जिल्हा रूग्णालयामार्फत चालणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. बालके, विद्यार्थ्यांच्या तपासणीत ह्दयविकार, कान-नाक-घशाचे आजार, दंतविकार, हाडांच्या आजाराची विद्यार्थ्यांना अधिक लागण झाल्याचे समोर आले आहे. प्रथमोपचारानंतरही ज्या बालकांचे, विद्यार्थ्यांचे आजार कमी होत नाही, अशांवर गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यात कान-नाक- घशाचे आजार असलेल्या ११२ जणांवर गत दीड वर्षात शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गतवर्षभरात ८६ जणांवर तर चालू वर्षात २६ जणांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दंतविकारही अनेक बालकांना आढळून आले आहेत. गत वर्षभरात १३० जणांच्या तर चालू वर्षात १२ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हाडांचे विविध गंभीर आजार असलेल्या २४ जणांवरही जिल्हा रूग्णालयामार्फत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत ह्रदयाचा आजार असलेले तब्बल ३५९ विद्यार्थी आढळून आले होते. यातील १४० जणांची इको टुडी तपासणी करण्यात आली. तपासणीत गंभीर आजार असलेल्या ६२ जणांवर मुंबई, औरंगाबाद येथील रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शासकीय खर्चातून झालेल्या शस्त्रक्रियेमुळे पालकांनाही मोठा आधार मिळाला आहे. याशिवाय अपेंडिक्स, किडनी व इतर आजारांनी ग्रासलेल्या मुलांवरही राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.दुभंगलेल्या ओठ, टाळूवर शस्त्रक्रियाअनेक बालकांचे जन्मत:च ओठ, टाळू दुभंगलेले असतात. त्यामुळे या बालकांना शारीरिक विकलांगपणा येतो.ओठ, टाळू दुभंगलेल्या ९५ बालकांवर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार करण्यात आले आहेत.जिल्ह्यात ३२ पथकेराष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तब्बल ३२ पथके कार्यरत आहेत. यात महिला, पुरूष वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता, एक परिचारिकेचा समावेश आहे. कार्यक्रम पर्यवेक्षक विद्या म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ठरलेल्या नियोजनानुसार दररोज ही पथके विद्यार्थ्यांची तपासणी करीत आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य