शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आयुक्तांकडून टँकर फेऱ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:51 IST

टँकरच्या फे-या दिलेल्या नियमानुसार होतात का हे पाहण्यासाठी शनिवारी अतिरिक्त आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. जिल्ह्यात सध्या जवळपास ४०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या फे-या दिलेल्या नियमानुसार होतात का हे पाहण्यासाठी शनिवारी अतिरिक्त आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी भेट दिली. त्यात फे-या नीट होत असल्याचे दिसून आले. परंतु टँकर भरण्यासाठीचे पाण्याचे स्त्रोत मात्र, आटल्याने चर खोदूनच टँकरसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आधीच मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा होता. त्यातच कडाक्याचे उन्हामुळे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने पाणी टंचाईचा मुद्दा गंभीर बनला आहे. जिल्ह्यात एकूण ४०० पेक्षा अधिक टँकर सुरू आहेत. त्यात खाजगी टँकरची संख्या लक्षणीय आहे. या टँकरच्या फे-या नियोजनानुसार होतात काय, हे पाहण्यासाठी टाकसाळे व त्यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे एक पथक गेल्या दोन दिवसांपासून जालना जिल्हा दौ-यावर आले आहे. त्यांनी प्रारंभी बदनापूर येथील सोमठाण धरणाची पाहणी केली. त्यातही अत्यल्प साठा असून, पाणी पुरणार नसल्याचे चित्र आहे. शनिवारी या पथकाने भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील प्रकल्पांना भेटी दिल्या. तसेच गावकºयांशी टँकरच्या फेºयांबाबत माहिती जाणून घेतल्याचे टाकसाळे यांनी सांगितले.पाहणी : रणरणत्या उन्हात प्रकल्पांना भेटअतिरिक्त आयुक्त शिवानंद टाकसाळे, नंदकुमार पगारे आणि स्थानिक गटविकास तसेच कृषी विभाग आणि पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांसह त्यांनी शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यातील विविध लघु आणि मध्यम प्रकल्पांना भेट दिल्या. यावेळी मोठी भयावह परिस्थिती असल्याचे त्यांच्या लक्षात आले.शुध्दतेची काळजी घ्यावीलघु आणि मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठे आटले आहेत. त्यामुळे चर खोदून विहिरीत पाणी सोडावे लागणार आहे. हे पाणी टँकरव्दारे जनतेला पुरविताना ते शुध्द असले पाहिजे. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे पाणी शुध्दीकरणासाठी वापरणारी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश टाकसाळे यांनी यावेळी दिले. एकूणच जिल्ह्यातील टँकरच्या फेºयांबाबतही त्यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधून, त्या ठरवून दिल्यानुसार होतात काय, असे विचारल्यावर अनेकांनी होकार दिला. तसेच खंडित वीजपुरवठा तसेच खराब रस्ते यामुळे टँकर भरून गावात येण्यास अडचणी येतात.

टॅग्स :water transportजलवाहतूकdroughtदुष्काळGovernmentसरकार